देशात चोवीस तासात 38 हजार 164 नव्या बाधितांची नोंद
@ नवी दिल्ली / वृत्तसंस्था
कोरोनाच्या तिसऱया लाटेची शक्मयता देशात वर्तवण्यात आली असून देशात गेल्या काही दिवसांपासून 40 हजारांहून कमी कोरोनाबाधितांची नोंद करण्यात येत आहे. रविवारी दिवसभरात 38 हजार 164 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तसेच मृत्यूसंख्येतही घट झाली असून मागील चोवीस तासात 499 जणांचा बळी गेल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. देशात आतापर्यंत कोरोनामुळे 4 लाखांहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशाचा पॉझिटिव्हिटी रेट 2.61 टक्के आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, देशाचा दैनंदिन पॉझिटिव्हिटी रेट 28 दिवसांपासून 3 टक्क्मयांहून कमी झाला आहे. तर रिकव्हरी रेट 97.32 टक्क्मयांवर पोहोचला आहे.
आरोग्य मंत्रालयाने सोमवारी सकाळी जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत कोरोनाच्या 3 कोटी 11 लाख 44 हजार 229 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. एकंदर बाधितांपैकी 3 कोटी 3 लाख 8 हजार 456 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच उपचारादरम्यान 4 लाख 14 हजार 108 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात सध्या 4 लाख 21 हजार 665 इतके सक्रिय रुग्ण आहेत. बहुतांश राज्यांमध्ये आता रुग्णसंख्येमध्ये घट होऊ लागली आहे. चाचण्या आणि लसीकरणाला गती दिल्याचा परिणाम सध्या दिसून येत आहे. महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून दैनंदिन कोरोनाबाधितांची संख्या दहा हजारांच्या आत आहे. रविवारी दिवसभरात 9 हजार नवीन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे.
तिसऱया लाटेबाबत मतभिन्नता
कोरोनाच्या संभाव्य तिसऱया लाटेवरून वैज्ञानिक आणि तज्ञांमध्येच मतभिन्नता दिसून येत आहे. देशात येत्या तीन आठवडय़ात कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचा दावा आयसीएमआरने (इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च) केला आहे. तर ‘आयआयटी’मधील शास्त्रज्ञांनी मात्र कोरोनाच्या तिसऱया लाटेचा भारताला मोठा धोका पोहोचणार नसल्याची स्पष्टोक्ती दिली आहे. ‘आयसीएमआर’मधील वैज्ञानिक समीरन पांडा यांनी तिसऱया लाटेत दररोज 1 लाख नवीन प्रकरणे येतील अशी भीती वर्तवली आहे. मात्र, आयआयटी कानपूरचे प्रोफेसर मणिंद्र अग्रवाल यांनी देशाला कोरोनाच्या तिसऱया लाटेचा धोका नसून भारत हर्ड इम्युनिटीजवळ पोहोचला असल्याचा दावा केला आहे.