रिकव्हरी रेट 74.30 टक्के : देशात 24 तासात 68 हजार 898 नवे पॉझिटिव्ह
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार शुक्रवारपर्यंत देशात कोरोनाग्रस्तांची संख्या 29 लाखावर पोहोचली आहे, तर 54 हजार 849 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासंत 68 हजार 898 नवीन लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 983 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रुग्णसंख्या वाढत असतानाच 24 तासात 62 हजारहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत. देशात आतापर्यंत कोरोनातून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 74.30 टक्के आहे.
गेल्या 20 दिवसात जवळपास देशात 62 ते 69 हजार नवीन रुग्णांची नोंद केली आहे. शुक्रवारीही हे प्रमाण कायम राहिले आहे. मात्र भारतात कोरोनामुक्त होणाऱयांच्या संख्येत आता दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. केंद्र सरकारने दिलेल्या आकडेवारीनुसार, एका दिवसात सर्वाधिक रुग्ण बरे झाल्याचा नवा उच्चांक भारताने गाठला आहे. गेल्या 24 तासांत भारतात तब्बल 62 हजार 282 जणांनी कोरोनावर मात केली आहे. एका दिवसात इतक्मया मोठय़ा संख्येने कोरोनामुक्त झालेल्यांची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी 17 ऑगस्ट रोजी 57 हजार 584 तर 12 ऑगस्ट रोजी एका दिवसात 56 हजार 110 रुग्ण कोरोनामुक्त झाले होते. भारतात कोरोनावर मात केलेल्यांची आतापर्यंतची एकूण संख्या 21 लाख 58 हजार 946 इतकी झाली आहे. यामुळे देशात आता केवळ 6 लाख 92 हजार 28 इतके कोरोनाबाधित सक्रिय रुग्ण असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होत आहे.
मृत्यूदर 1.89 टक्के
गेल्या 24 तासात भारतात कोरोनामुळे 983 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ही 54 हजार 849 इतकी झाली आहे. कोरोना मृत्यूदरात घसरण झाली असून तो आता 1.89 टक्के इतका झाला आहे. तर बाधितांचा एकूण आकडय़ाने 29 लाखाचा टप्पा पार केला आहे.
दिवसभरात 8 लाखांहून अधिक चाचण्या
भारतात कोविड-19 या संसर्गजन्य आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र आणि राज्य पातळीवर मोठय़ा प्रमाणावर प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच भाग म्हणून प्रतिदिन कोरोना चाचण्यांचे प्रमाणही वाढवण्यात येत असून गुरुवारी भारतात कोरोना चाचण्यांनी नवा उच्चांक गाठला. चोवीस तासात 9 लाखांपेक्षा अधिक चाचण्या झाल्या होत्या. त्यापाठोपाठ दुसऱया दिवशीही 8 लाख 5 हजार 985 इतक्या चाचण्या करण्यात आल्या. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी यासंबंधीची आकडेवारी जाहीर केली. चाचण्यांचा वेग वाढविल्यामुळे आतापर्यंत झालेल्या एकूण चाचण्यांची संख्या 3 कोटी 34 लाख 67 हजार 237 इतकी झाली आहे. सद्यस्थितीत भारतात एकूण 1,504 प्रयोगशाळा असून त्यात 978 सरकारी आणि 526 खासगी प्रयोगशाळांचा समावेश आहे.