देशात रुग्णसंख्या 12 लाख 87 लाखांवर : चोवीस तासात 34,662 जणांना डिस्चार्ज
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशात कोरोनाचे थैमान सुरुच असून सलग दुसऱया दिवशी 45 हजारहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारपर्यंत गेल्या 24 तासांत देशभरात तब्बल 49 हजार 310 नवे रुग्ण आढळले आहेत. तर 740 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. देशात एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 12 लाख 87 हजार 945 इतकी झाली आहे. 8 लाख 17 हजार 209 रुग्ण उपचारानंतर घरी परतले आहेत. तर आतापर्यंत देशात एकूण 30 हजार 601 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सर्वतोपरी काळजी घेण्यात येत असूनही देशात कोरोनाचा प्रकोप सुरूच आहे. गेल्या दोन दिवसात जवळपास 93 हजार रुग्णांची नोंद झाली आहे. मागील चार दिवसात 38 ते 45 हजारपर्यंत रुग्ण आढळले होते. त्यानंतर शुक्रवारी त्यात आणखी वाढ होऊन 49 हजारांहून अधिक बाधितांची नोंद झाली आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसागणिक देशात वाढतच आहे. देशातील कोरोना रुग्णवाढीचा हा नवा उच्चांक नोंदविण्यात आला आहे.
देशात बरे होणाऱयांचे प्रमाण 63.18 टक्क्मयांवर पोहोचले आहे. देशात आतापर्यंत 8,17,209 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. शुक्रवारी दिवसभरात 34 हजार 662 रुगांना डिस्चार्ज देण्यात आल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले. गेल्या तीन दिवसांत दहा लाख चाचण्या करण्यात आल्या. त्यातील गेल्या 24 तासांत सुमारे साडेतीन लाख चाचण्या करण्यात आल्या. आता चाचण्यांची क्षमता वाढविण्यात आली असून, रोज जवळपास चार लाख चाचण्या करण्यात येणार असल्याचे ‘आयसीएमआर’चे माध्यम समन्वयक लोकेश शर्मा यांनी सांगितले.