बेळगाव /प्रतिनिधी
शहरात रोजच रहदारी वाहतूक पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. यात विनाहेल्मेट, विना वाहन परवाना, दुचाकी इन्शुरन्स आदी बाबींची पडताळणी करण्यात येत आहे. असे असले तरी वाहनधारक याबाबत जागरुक नसल्याचे दिसून येत आहे. दिवाळीच्या शुभमुहूर्तावर पोलिसांनी सकाळपासूनच या कारवाईला प्रारंभ केला होता. काँग्रेस रोड, खानापूर रोडवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला.
रहदारी वाहतूक पोलिसांकडून सकाळपासून संध्याकाळपर्यंत शहराच्या मुख्य मार्गावर कारवाई करण्यात येत होती. दिवाळीच्या खरेदीसाठी परगावाहून येणाऱया व्यावसायिकांची व नागरिकांची कसून चौकशी करण्यात येत होती. याशिवाय त्यांच्याकडे दुचाकीची कागदपत्रे नसल्यास कारवाई करून दंड आकारण्यात येत होता..