ऑनलाईन टीम / मुंबई :
दिवाळीनंतर ठाकरे सरकारमधील 3 मंत्री आणि त्यांच्या 3 जावयांचे असे 6 जणांचे फटाके फोडणार असल्याचे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे.
सोमय्या यांनी आज सकाळीच यासंदर्भात ट्विट केले होते. त्यानंतर मालाड पूर्वमध्ये भाजपा दिंडोशी कार्यकर्त्यांसोबत संवाद साधताना सोमय्या म्हणाले, लोक दिवाळीत फटाके फोडतात. मात्र, मी दिवाळीनंतर फटाके फोडणार आहे. एक-दोन नाही तर पूर्ण अर्धा डझन लोकांचे फटाके फोडणार आहे. ठाकरे सरकारमधील 3 घोटाळेबाज मंत्री आणि त्यांच्या 3 जावयांचे फटाके फोडणार आहे. अजित पवार, हसन मुश्रीफ आणि नवाब मलिकांनी त्यांच्या जावयाला खूश केलं. राष्ट्रवादीने आर्यन खान प्रकरणात लवंगी लावली पण मी बॉम्ब फोडणार असल्याचे सोमय्या यांनी म्हटले आहे.