कामात सुट मिळूनही ग्रामसेविका संगीता पाटील यांचे काम आदर्शवत
पाटील यांचे क्वारंटाईन हमीपत्र जिल्हय़ात ठरले रोल मॉडेल
आठ महिन्यांचे बाळ असूनही घेतली नाही सुट्टी
अजय कांडर / कणकवली:
शासनाने 50 वर्षांवरील ज्ये÷ कर्मचारी, उच्च रक्तदाब व हृदयरोगग्रस्त कर्मचारी व शारीरिकदृष्टय़ा दिव्यांग असणाऱया कर्मचाऱयांना कोरोनाच्या काळात कामातून सुट दिलेली असूनही पियाळी येथील दिव्यांग ग्रामसेवक संगीता पाटील-जाधव यांनी सुट्टी न घेता केलेले काम आदर्शवत म्हणावे लागेल. त्यांनी बनविलेले होम क्वारंटाईन हमीपत्र जिल्हय़ात रोल मॉडेल ठरले असून या हमीपत्राबाबत जिल्हाधिकारी कार्यायालयाकडूनही गौरवोद्गार काढण्यात आले आहेत. त्यांचे आठ महिन्यांचे बाळ असतानाही त्यांनी या कोरोना काळात जोखीम पत्करून असे काम केल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतूक होत आहे.
कोरोनात शासकीय व प्रशासकीय विभागातील अपुऱया कर्मचारी संख्येमुळे शासनाला प्रशासनाचा गाढा हाकताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यातच शारीरिकदृष्टय़ा दिव्यांग कर्मचाऱयांना कोरोनाच्या काळात कामातून सुट देण्यात आली आहे. मात्र, कणकवली तालुक्मयातील पियाळी ग्रा.पं.मध्ये कार्यरत ग्रामसेविका संगीता चंद्रकांत पाटील-जाधव यांनी कोरोनाच्या काळात स्वतः दिव्यांग आणि पदरी पाच वर्षांची कन्या व केवळ आठ महिन्यांचे तान्हुले बाळ असतानाही त्यांनी दिव्यांग कर्मचाऱयांना कोरोना कामकाजातून मिळणारी सुट नाकारली.
जिल्हाधिकारी कार्यालयाकडूनही कौतुक
ग्रामस्तरावरील योजनांपासून ग्रामस्थांनी वंचित राहू नये, कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी गावात विविध जनजागृतीपर कार्यक्रम राबवून पाटील यांनी गावात उत्तम सेवा बजावली. त्यांनी ग्रामस्थांना होम क्वारंटाईन करण्याबाबतचे तयार केलेले हमीपत्र जिल्हय़ात रोल मॉडेल ठरले. जिल्हय़ातील कित्येक ग्रा.पं.नी त्यांच्या हमीपत्राचा आधार घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयाकडूनही याबाबत गौरवोद्गार काढण्यात आले. कोरोना काळातही दिव्यांग कर्मचारी शारीरिक वैगुण्यावर मात करून चांगले काम कसे करू शकतो, हे सिद्ध करून दाखविल्याने त्यांचे सर्व स्तरातून कौतूक होत आहे.
पियाळी येथे पाच वर्षे कार्यरत
त्या पियाळी येथे गेली पाच वर्षे कार्यरत आहेत. ग्रामस्थांच्या विविध समस्या सोडवून शासकीय योजनेचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी सतत धडपडत असतात. त्यांनी दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर शारीरिक वैगुण्याची तमा न बाळगता आपल्या 15 वर्षांच्या सेवा कालावधीत ग्रा.पं.कडून शासनाचे पर्यावरण संतुलीत ग्राम अभियान, निर्मलग्राम, वनराई बंधारे आदी उपक्रम यशस्वीपणे राबविले आहेत. त्या इतर सर्वसामान्य कर्मचाऱयांप्रमाणे गरजू ग्रामस्थांचे अनेक जटील प्रश्न सोडवितात. होम क्वारंटाईनसारख्या जटील प्रश्नांमुळे सगळय़ा ग्रा.पं.ची डोकेदुखी वाढली असताना पाटील-जाधव यांनी हा प्रश्न व्यवस्थित हाताळला. याकामी पियाळीचे सरपंच, ग्रामस्थ, कणकवली भाजपचे तालुकाध्यक्ष संतोष कानडे, सदस्य, ग्रामस्थ आणि सामाजिक, राजकीय मंडळींनी त्यांना मोलाची मदत केली.
ग्रामसेवक पतीचे पूर्ण सहकार्य
त्या म्हणतात, माझे वडील सेवानिवृत्त मुख्याध्यापक असूनही त्यांनी सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. माझे सासरे कै. चंद्रकांत भिकाजी जाधवही सामाजिक क्षेत्रात अग्रेसर होते. त्यांना राज्य शासनाचा मानाचा दलितमित्र पुरस्कार मिळाला होता. त्यांच्या कार्याच्या प्रेरणेमुळेच मी स्वतःला दिव्यांग समजत नाही. समाजातील वंचित, दुर्बल घटकांना शासनस्तरावरचा लाभ कसा मिळेल, यासाठी काम करते. याकामी मला माझ्या ग्रामसेवक पतीची कायमच मोलाची साथ मिळतेय. कोरोनाला हद्दपार करण्यासाठी सगळय़ांना एकत्र येऊन लढा द्यायचा आहे. कोरोनानंतर सर्व यंत्रणांवर अतिरिक्त कामाचा ताण पडणार असल्याने सर्व ग्रा.पं.नी आणि ग्रामस्थांनी शासनाला सहकार्य करणे गरजेचे आहे.
सकारात्मक दृष्टिकोनातून यश
कोरोना काळात दिव्यांग व्यक्तींना कामातून सुट मिळाली असली, तरी मी कोरोनात काम करण्याचा निर्णय घेतला. बाळ लहान आहे, तरी आपली अशाच काळात जबाबदारी असते, याची मला जाणीव होती. दिव्यांग व्यक्तींनी आपल्या शारीरिक व्यंगावर मात करत यश मिळविलेली अनेक उदाहरणे आहेत. असा सकारात्मक दृष्टिकोन मी ठेवून काम करत असल्याने माझ्या कामात यश मिळत गेले, असे संगीता पाटील-जाधव यांनी सांगितले.