जिह्यात 10 हजारांहून अधिक गणरायांचे विसर्जन
प्रतिनिधी/ रत्नािगरी
जिह्यात शुक्रवारी बाप्पांची भक्तिमय वातावरणात प्रतिष्ठापना झाली. यानंतर शनिवारी जिह्यातील 10 हजारांहून अधिक दीड दिवसांच्या घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून विसर्जन करताना नियमावली आखून दिलेली होती. याचे गणेशभक्तांनी पालन केल्याचे दिसले. रत्नागिरी नगर परिषदेतर्फे गणेशभक्तांच्या सोयीसाठी कृत्रिम विसर्जन तलाव उभारले आहेत.
शुक्रवारी जिह्यात 1 लाख 66 हजार 539 घरगुती आणि 114 सार्वजनिक गणपतींची प्रतिष्ठापना झाली. काही भक्तांच्या घरी दीड दिवसांचा पाहुणचार घेतल्यानंतर 10 हजाराहून अधिक गणेशांचे विसर्जन झाले. रत्नागिरीतील मांडवी समुद्रकिनारी गणेशभक्तांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासन नियमानुसार विसर्जन केले. विसर्जनस्थळी मोठी गर्दी दिसून आली नाही. कुटुंबातील केवळ काही व्यक्तीच उपस्थित होत्या. तर गणेशाचे समुद्रात विसर्जन करण्यासाठी केवळ दोघेजणच पाण्यात उतरत होते. अनेकांनी खासगी वाहनांमधून आपल्या लाडक्या गणरायाला विसर्जनस्थळी नेले. कोणतीही मिरवणूक न काढता गणरायाचे विसर्जन करण्यात आले. मांडवी समुद्रकिनारी चोख पोलीस बंदोबस्त होता.
चिपळुणात 5 सार्वजनिकसह अनेक घरगुती गणरायांचे विसर्जन
चिपळूणः शुक्रवारी मोठय़ा दिमाखात लाडक्या बाप्पाचे आगमन झाल्यानंतर शनिवारी 5 सार्वजनिक गणशोत्सव मंडळांसह अनेक घरगुती दीड दिवसाच्या गणरायाचे विसर्जन करण्यात आले. शुक्रवारी बाप्पाचा जयघोष करत पारंपरिक वाद्यांच्या गजरात लाडक्या बाप्पाचे आगमन झाले. स्वागतानंतर बाप्पाची मनोभावे पूजा-आरती झाल्यानंतर शनिवारी दीड दिवसाच्या गणरायाचे विसर्जन केले. शासनाने सार्वजनिक गणशोत्सव मंडळांसाठी विशेष असे नियम लागू केल्याने त्यानुसार ही मंडळे हा उत्सव साजरा करत आहेत. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे अनंत चतुर्दशीपर्यंत गणेशोत्सव साजरा करतात. मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दीड दिवसाचा गणेशोत्सव साजरा केला जात आहे. दीड दिवसाच्या सार्वजनिक गणशोत्सव मंडळात खेर्डी वरचीपेठ, सार्वजनिक बांधकाम, महावितरण, कापसाळ कॉलनी, माधव सभागृह आदी मंडळांचा सहभाग आहे.