प्रतिनिधी/ बेळगाव
विघ्नहर्ता गणेशाचे शुक्रवारी थाटात आगमन झाले. दीड दिवस पाहुणचार केल्यानंतर परंपरेनुसार गणेशभक्तांनी शनिवारी दुपारनंतर गणरायाचे विसर्जन केले. बेळगावमधील जक्कीनहोंड, कपिलेश्वर विसर्जन तलाव येथे गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. ना मोठी मिरवणूक ना फटाक्मयांची आतषबाजी अशा साध्या पद्धतीने जड अंतःकरणाने गणेशभक्तांनी गणरायाला निरोप दिला.
परंपरेनुसार काही कुटुंबांमध्ये दीड दिवस गणरायाची प्रति÷ापना केली जाते. गणरायाच्या आगमनापासून विसर्जनापर्यंत आरती, भजन व विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या दीड दिवसामध्ये कुटुंबातील सर्व व्यक्ती एकत्रित येऊन त्यांनी गणेशाचे पूजन केले. ‘कोरोनाचे संकट लवकर दूर होवू दे’ ही एकच मागणी गणरायाकडे करत निरोप देण्यात आला. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वषी लवकर या’, अशा घोषणा देत गणरायांना निरोप देण्यात आला.
बेळगाव महानगरपालिकेच्यावतीने जक्कीनहोंड, वडगाव, जुने बेळगाव, अनगोळ, कपिलेश्वर या ठिकाणी विसर्जन तलावांवर व्यवस्था करण्यात आली होती. सायंकाळी 5 नंतर या विसर्जन तलावांवर हळूहळू गर्दी होऊ लागली. भक्तांनी जवळपासच्या विसर्जन तलावांवर जाऊन गणेशमूर्तींचे विसर्जन केले. कोरोनाचे संकट असल्यामुळे कुटुंबातील मोजक्मयाच व्यक्तींना घेऊन जाऊन विसर्जन केले जात होते. दुचाकी, चारचाकी व रिक्षांमधून गणेशमूर्ती विसर्जनासाठी आणल्या जात होत्या. एकाचवेळी गर्दी होऊ नये, यासाठी पोलीस प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेण्यात आली होती.
फिरत्या विसर्जन वाहनांना अल्प प्रतिसाद
गर्दी टाळण्यासाठी महानगरपालिकेकडून फिरत्या विसर्जन वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या शिफारशीनुसार पाण्याचे प्रदूषण टाळण्यासाठी फिरती वाहने जागोजागी ठेवण्यात आली होती. परंतु या वाहनांमध्ये गणेशमूर्ती विसर्जन करण्यास तितकासा प्रतिसाद मिळाला नाही. गणेशभक्तांकडून जवळील विसर्जन तलावावरच विसर्जन केले जात होते.