माशा मारण्याचा अर्थ कदाचित नवाब मालिकांना ठावूक नसावा किंवा कळून वळत नसावा, केशव उपाध्येंचं नवाब मलिकांना प्रत्युत्तर!
मुंबई/प्रतिनिधी
मराठा आरक्षण देणारा कायदा सर्वोच्च न्यायालयाने रद्द ठरवल्यानंतर आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. आता केंद्र सरकारने प्रथमच पुढाकार घेत पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. मात्र, त्यासोबतच केंद्रानं ५० टक्क्यांवरच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर देखील विचार करावा आणि याचिका करावी, अशी मागणी महाराष्ट्र सरकारकडून करण्यात आली आहे. प्रत्येकवेळी केंद्राकडे बोट दाखविण्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील ठाकरे सरकारवर परखड शब्दांत टीका केली. फडणवीसांनी “सगळं केंद्रानं करायचं आणि राज्यात आम्ही माशा मारायच्या आणि मिळालेलं आरक्षण घालवायचं हे किती दिवस चालणार?” असा सवाल केला होता. यावरून राज्याचे अल्पसंख्याकमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसेच प्रवक्ते नवाब मलिक यांनी फडणवीसांवर निशाणा साधला होता. “नवाब मालिकांनी फडणवीसजी तुम्हाला आता माशा मारण्याशिवाय कामच काय उरलं आहे? असा पलटवार केला होता. आता नवाब मलिकांना भाजपा प्रवक्ते केशव उपाध्येंनी प्रत्युत्तर दिलं आहे.
केशव उपाध्ये यांनी “माशा मारण्याचा अर्थ कदाचित नवाब मलिक यांना ठावूक नसावा किंवा कळून वळत नसावा. माशा मारण्याची स्पर्धा तर गेल्या दीड वर्षांपासून महाराष्ट्रात अखंड सुरूच आहे. सत्ताधारी घरात लपून आहेत आणि आमचे नेते देवेंद्र फडणवीस प्रत्येक जिल्ह्यात प्रवास करता आहेत.” असं ट्विटद्वारे म्हटलं आहे.
‘