कणकवली : वार्ताहर–
१९९९ मध्ये उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री होण्याची इच्छा होती. तसेच त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी मातोश्रीवर बोलावून सावंतवाडी मतदारसंघासाठी उमेदवार म्हणून आशिर्वाद दिलेल्या माझ्यासारख्याचे तिकीट कापून त्यावेळी शिवसेनेशी संबंध नसलेल्या शिवराम दळवी यांना देण्यात आले होते. त्यात त्यावेळी खासदार विनायक राऊत, दत्ता दळवी व इतर काही सेनेतील मंडळी हेती. दिपक केसरकर यांना शिवसेनेचा हा इतिहास माहित नाही. शिंदेसोबत बाहेर पडलेल्या ४० आमदारांचे त्यांच्या मतदारसंघांत भव्य स्वागत होते, पण केसरकरांचे होत नाही, याचा विचार त्यांनी करावा. त्यांच्या वक्तव्यांना आवर घालण्याची मागणी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे आजच करणार असल्याचे भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी सांगितले.
येथील भाजपा जिल्हा कार्यालयात पत्रकारांशी श्री. तेली बोलत होते.