अचूक बातमी “तरुण भारत”ची; सोमवार 8 ऑक्टोबर 2021, स. 11.00
● नीचांकी नोंद करत वाढीचा आलेख खाली
● रविवारी अहवालात फक्त 11 बाधित
● एकूण 573 जणांची तपासणी
● दीपावली संपली आता लस घ्या
● सलग तिसऱ्या दिवशी निच्चांकी वाढ नोंद
● अखेर जिल्हा सावरू लागला
सातारा / प्रतिनिधी :
‘बाधित वाढीच्या आलेखाचा प्रवास शुन्याकडे’ असा मथळा घेऊनच कालच्या ‘अचूक बातमी’चा प्रारंभ झाला होता. कोरोना संसर्गाच्या एकूण कालावधीत ‘तरुण भारत’ने अचूक बातमीच्या माध्यमातून जे अंदाज व्यक्त केले ते तंतोतंत खरे ठरले आहेत. आता दीपावलीत देखील रविवारच्या अहवालाने जिल्ह्याला मोठा दिलासा दिला असून गत 9 महिन्यानंतर पुन्हा नीचांकी बाधित वाढ नोंद झाली आहे. फक्त 11 जणांचा अहवाल बाधित आला असून, कोरोना बाधित वाढीचा आलेख शुन्याकडे जाऊ लागला आहे.
जिल्ह्यात 11 नवे बाधित
सोमवारी सकाळी प्रशासनाकडून देण्यात आलेल्या रविवारी रात्रीच या अहवालातील माहितीनुसार 573 जणांची तपासणी झाली असून, यामध्ये फक्त 11 जणांचा अहवाल बाधित आलेला आहे. यामध्ये पॉझिटिव्हिटी दर जरी 2 टक्के एवढा दिसला तरी बाधित वाढ मंदावली असून तिचा प्रवास शुन्याकडे सुरू असल्याने नागरिकांना भयमुक्त जीवन जगता येणार आहे.
लसीकरणाचा वेग मंदावलाय
जिल्हय़ात दुसरी लाट ओसरल्यानंतर सप्टेंबर, ऑक्टोबर दोन महिन्यांपासून रुग्ण संख्या कमी होत आहे. अशातच काही दिवसांतील निच्चांकी रुग्ण संख्येची नोंद दिलासा देवू लागली आहे. मात्र, एकीकडे कोरोना बाधित वाढीचा वेग मंदावत असताना कोरोनामुक्तीचा वेगही मंदावला आहे. लसीकरणाची गती मंदावल्याचे चित्र सध्या जिल्हय़ात आहे.
सातारा सोडल्यास सर्व तालुके शून्याकडे
शनिवारी रात्री अहवालात जिल्हय़ात फक्त 20 नवीन बाधित आढळून आले होते. त्यापैकी निम्मे 9 सातारा तालुक्यात आहेत. तर इतर पाच तालुक्यात रुग्ण संख्या नगण्य आहे. यामध्ये कोरेगाव, खटाव, जावली, महाबळेश्वर, पाटण, खंडाळा हे तालुके अपवाद वगळता नोव्हेंबरमध्ये सलगपणे निरंक राहू लागले आहेत. रविवारी फक्त 11 नवीन बाधित समोर आल्याने सातारा तालुका सोडल्यास इतर सर्व तालुक्यांचा प्रवास शुन्याचा दिशेने केव्हाच सुरू झाले आहे. अधून-मधून नगण्य नवीन रुग्ण संख्या समोर येत असली तरी दीपावलीच्या आनंदोत्सवात जिल्ह्याचा प्रवास कोरोनामुक्तीकडे सुरू झाला आहे.
दीपावली संपली आता लस घ्या
मंदावणारी बाधित वाढ आणि त्यातच आलेली दीपावलीमुळे गत पंधरा दिवसांपासून जिल्ह्यातील लसीकरण मोहिमेला ब्रेक लागला आहे. अगदी नगण्य संख्येने लसीकरण सुरू आहे. एकूण लसीकरण साडे 28 लाखाच्या पुढे झाल्याने राज्यात जिल्ह्याचा पाचवा क्रमांक असला तरी आता शंभर टक्के लसीकरणाच्या दिशेने पाऊल टाकल्यास जिल्ह्यात तिसऱ्या लाटेचा धोका टळू शकतो. बाधित वाढ मंदावली आहे पण संपलेली नाही. नागरिकांनी नियम पाळतानाच लसीकरण करुन करण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा.
रविवारी 260 जणांना लस
जिल्हय़ात शासनाकडून लस मोठया प्रमाणावर उपलब्ध आहे. मात्र नागरिकांकडून प्रतिसाद मिळत नाही. रविवारी फक्त 260 जणांनी लस घेतली आहे. त्यामुळे जिल्हय़ातील लस घेणाऱ्या नागरिकांची एकूण संख्या 28 लाख 42 हजार 399 एवढी झाली आहे. यामध्ये पहिला डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या 19 लाख 67 हजार 533 एवढी असून दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या 8 लाख 74 हजार 866 एवढी झालेली आहे.
रविवारपर्यंत जिल्हय़ात
एकूण नमुने 22,44,438
एकूण बाधित 2,51,501
कोरोनामुक्त 2,43,733
एकूण मृत्यू 6,444
सक्रीय रुग्ण 411
रविवारी जिल्हय़ात
बाधित 20
मुक्त 01
मृत्यू 01