उपजिल्हाधिकारी चंद्रकांत शेटकर यांचे आवाहन
प्रतिनिधी/ मोरजी
पेडणे तालुक्मयातील प्रत्येक गावात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा व्हावा, यासाठी पेडणेचे उपजिल्हाधिकारी चंद्रकांत शेटकर, मामलेदार अनंत मलिक, संयुक्त मामलेदार गौतमी परमेकर यांच्यासह पोलीस यंत्रणा चोवीस तास कार्यरत आहे.
उपजिल्हाधिकारी व मामलेदार कार्यालय तसेच नागरी पुरवठा खात्याला भेट दिली असता त्याठिकाणी ही सरकारी यंत्रणा सक्षम पणे कार्यरत असताना दिसून आली प्रामुख्याने उपजिल्हाधिकारी श्री शेटकरआणि त्यांचे सहकारी दुपारची सुट्टी न घेता काम करीत असल्याचे दिसून आले पेडणे तालुक्मयातील गावागावात धान्य पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी ते जातीने लक्ष देवून होते आपल्या मितस्वभावी आणि सहकारी वृत्तीचा अनुभव ते प्रत्येकाला देताना दिसत होते येणार्याशी अगदी आपुलकीने वागणे आपल्या कार्यालयातील सहकार्यांना योग्य ते मार्गदर्शन करून स्वयंसेवक ,पंचायत प्रतिनिधी ,दुकानदार यांना आवश्यक आलेले जनता कार्फ्य?तील धान्य खरेदी साठी वाहन परवाने ,स्वयंसेवक परवाने कमीत कमी वेळात उपलब्ध करून देण्यासाठी ते कार्यरत असल्याने पेडणे तालुक्मयात हळू हळू परिस्थिती सुधारत असल्याचे चित्र दिसत आहे
याविषयी उपजिल्हाधिकारी श्री शेटकर यांच्याशी बातचीत केली असता ते म्हणाले ,पेडणे तालुक्मयातील नागरिकांना तांदूळ ,गहू कडधान्य तसेच अन्य किराणा माल कमी पडणार नाही याची दक्षता आम्ही घेत आहोत त्यासाठी भुसारी दुकानदाराना माल खरेदी करण्यासाठी गाडीचा परवाना देणे घरो घरी माल वितरीत करण्यासाठी प्रत्येक पंचायत क्षेत्रात स्वयंसेवक नियुक्तीचे काम आम्ही करीत आहोत त्यासाठी तालुक्मयातील मंत्री ,आमदार यांचे मार्गदर्शन लाभत आहे ,नगराध्यक्ष ,सरपंच ,पंच सदस्य समाज सेवक यांचे पूर्ण सहकार्य मिळत आहे मात्र काही ठिकाणी दुकानदाराकडून कृत्रिम टंचाई भासवून वस्तूंच्या किमती वाढविल्याच्या तक्रारी कानावर येत आहेत तर काही नागरिक गरजे पेक्षा जास्त धान्य साठा करीत आहेत असे लक्षात आले आहे तरी दुकानदारांनी वस्तु?च्या किमती वाढवू नयेत कृत्रिम टंचाई करू नये तसेच नागरिकांनी घाबरून साठेबाजीला उत्तेजन देवू नये लवकरच नागरी पुरवठा खात्यातर्फे रेशन धारकांना तांदूळ गहू ,यासारख्या वस्तू वितरीत करण्यास सुरवात केली जाणार आहे दुध ,भाजी गस सिलिंडर यासारख्या जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करून दिल्या जातील प्रत्येक नागरिकाची काळजी सरकार घेणार आहे त्यामुळे घाबरू नये कोणत्याही परिस्थितीत घराबाहेर पडू नये असे सांगितले असे त्यांनी सांगितले
मामलेदार अनंत मलिक म्हणाले तालुक्मयात कायदा सुव्यवस्था आणि धान्य खरेदीत सोशल अन्तर पाळण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत पत्रादेवी ,किरणपाणी ,सातार्डा याठिकाणी सिमेवर आम्ही चौवीस तसा कडक बंदोबस्त ठेवून आहोत यासाठी आमच्या संयुक्त मामलेदार गौतमी परमेकर व अन्य सहकारी कार्यरत असल्याचे ते म्हणाले तसेच कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीवर नियंत्रण ठेण्यासाठी लोकांनी सहकार्य करावे कोणत्याही परिस्थितीत घराबाहेर पडू नये असे सांगितले