सातारा / प्रतिनिधी
सातारा जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस कोविड संक्रमित रुग्णांची संख्या वाढत आहे. या वाढत्या रुग्णसंख्येला वेळीच नियंत्रण आणण्यासाठी अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तथा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी शहरी व ग्रामीण भागातील सर्व प्रकारचे व्यापारी, रास्तभाव, किरकोळ दुकानदार व भाजीपाला दुकानदार इत्यादींना पुढीलप्रमाणे आदेश निर्गमित केले आहेत.
- दुकानांमध्ये येणाऱ्या ग्राहकांना सामाजिक अंतर राखण्यासाठी दुकानदारांनी पांढऱ्या रंगात चौकोनी, गोल मार्किंग निश्चित करावे.
- एकाचवेळेस दुकानात 5 पेक्षा जास्त ग्राहक घेऊ नये.
- दुकानामध्ये येणाऱ्या ग्राहकामधील अंतर किमान एक मीटर असणे आवयक आहे.
- दुकान परिसरामध्ये स्वच्छता राखणे आणि वेळोवेळी सॅनिटायझेशन करणे आवश्यक आहे.
- दुकानामध्ये दुकानदारासह ग्राहकांनी कायमस्वरुपली मास्क परिधान करणे बंधनकारक आहे.
- भाजी विक्रेत्यांनी एकाच वेळी जासत ग्राहक जमणार नाहीत, याची दक्षता घ्यावी.
वरीलप्रमाणे कोविड-19 च्या अनुषंगाने निर्गमिक करण्यात आलेल्या सूचनांचे पालन न केल्यास आणि संबंधितांकडुन या आदेशाचा भंग झाल्यास रु. 1000/- दंडात्मक कारवाई करण्यात येईल. तसेच दुकान पुढील 7 दिवसांसाठी सक्तीने बंद करण्यात येईल. त्याचप्रमाणे आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51, भारतीय साथरोग अधिनियम 1897 व भारतीय दंड संहिता 1860 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला, असे मानण्यात येईल. त्याचबरोबर नियमानुसार पुढील योग्य ती कारवाई संबंधितांवर करण्यात येईल.