प्रतिनिधी /बेळगाव
त्रिपुरा येथील दंगल व वासीम रिजवी यांनी आपल्या पुस्तकात महम्मद पैगंबर यांच्याबद्दल आक्षेपार्ह लिखान केल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी काही मुस्लीम संघटनांनी बंदची हाक दिली होती. या पार्श्वभूमीवर खडेबाजार येथील दुकाने बंद ठेवली होती.
रजा अकादमीने देशभर बंदची हाक दिली होती. या बंदमध्ये सहभागी होत खडेबाजार, भेंडीबाजार, दरबार गल्ली परिसरात दुकाने बंद ठेवण्यात आली. रिक्षाचालकांनीही आपला व्यवसाय बंद ठेवला. येथील सिरत कमिटीच्यावतीने जिल्हाधिकाऱयांना निवेदनही देण्यात आले आहे. वासीम रिजवी यांच्या पुस्तकात आक्षेपार्ह लिखान आहे. त्रिपुरा येथील दंगलीला कारणीभूत असणाऱयांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली होती. बेळगावातही या पार्श्वभूमीवर झालेल्या बंदला मुस्लीम बहुल भागातील व्यापाऱयांनी प्रतिसाद दिला व आपले व्यवहार बंद ठेवले.