दरबार गल्लीतील घटनेने खळबळ
प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोना काळात रात्रीच्यावेळी पोलिस बॅरिकेड्स लावून वाहनांची तपासणी तसेच विचारणा करत आहेत. दरबार गल्ली येथे सोमवारी रात्री अशाचप्रकारे दुचाकीस्वाराला अडवून त्याची चौकशी करताना दुचाकीवरून आलेल्या तिघांनी पोलिसांवरच हल्ला केल्याची घटना घडाली. या घटनेमुळे खळबळ उडाली असून पोलिस त्यांचा तपास करत आहेत.
अतिसंवेदनशील म्हणून ओळखल्या जाणाऱया दरबार गल्ली येथून तिघेजण मोटरसायकलवरून जात होते. यावेळी पोलिसांनी त्यांना अडविले. मात्र अडविले का म्हणून त्यांनी पोलिसांवरच हल्ला केला. यावेळी आणखी काही मित्रांना बोलावून घेऊन हा हल्ला केला. यात पोलिस जखमी झाला आहे. या घटनेनंतर संताप व्यक्त होत असून पोलिस अधिक तपास करत आहेत.