- वेळेवर न्याहारी न करणं किंवा न्याहारी न करता सरळ दुपारचं जेवण घेणं, वजन कमी करण्याच्या अतिवेडापायी स्वतःला उपाशी ठेवणं या सवयी नुकसानदायक ठरु शकतात.
- याबाबत अनेक अभ्यासकांकडून संशोधनही होत असतं. अशाच एका रिसर्चमधून दुपारच्या जेवणाबाबत काही सल्ला देण्यात आला आहे.
- त्यानुसार दुपारचं जेवण जर 4 वाजेनंतर केलं गेलं तर त्याचा उलट परिणाम समोर येतो. म्हणून लंच नेहमी दुपारी दोन ते तीनपूर्वी करणं आवश्यक आहे.
- तुम्ही जर सातत्याने दुपारी तीन नंतर जेवत असाल तर कुठल्याही प्रकारचा योगा, डाएट, व्यायाम केला तरीही आपलं वजन कमी होणार नाही.
- या संशोधनानुसार, जे लोक काम जास्त आहे म्हणून आपली जेवणाची वेळ टाळतात आणि दुपारी 3 नंतर जेवतात त्यांचं वजन कमी होण्याऐवजी वाढतं. ङअमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशनने स्पेनमध्ये 1200 लोकांवर हा रिसर्च केला गेला. या 1200 जणांनी रिसर्चदरम्यान नेहमी दुपारी 3 नंतर जेवण केलं आणि वजन कमी करण्यासाठी सर्व प्रकारचे व्यायाम आणि डाएट केले. तरीही त्यांचं वजन कमी झालं नाही. याउलट ज्या व्यक्ती दुपारी 1 ते 2 च्या दरम्यान जेवत होत्या त्यांचं वजन कमी झालं होतं.
Previous Articleजिल्हा शल्य चिकित्सकांचा अटकपूर्व जामीन फेटाळला
Next Article मोटो जी 30 व 10 पॉवर आज होणार लाँच
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.