लोणावळा / प्रतिनिधी :
तंत्रज्ञानाचा होणारा विस्तार आपण नाकारू शकत नाही, त्यामुळे यंत्र आणि माणूस यांनी एकत्रितपणे काम कसे करावे, याचे शिक्षण देणे ही आजच्या काळाची खूप मोठी गरज आहे. सध्या देश दुभंगतोय, अशा परिस्थितीत शिक्षणानेच माणूस एकत्र येऊन भविष्य घडवू शकतो, असे मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी येथे केले.
‘माणूस घडवणारे शिक्षण’ या विषयावर मनशक्ती प्रयोगकेंद्र, लोणावळा येथे आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय शिक्षण परिषद 2020 या कार्यक्रमाची सांगता डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या मांडणीने झाली. लोणावळा येथील मनशांती आश्रमात हा कार्यक्रम पार पडला. मनशक्ती शिक्षण परिषदेच्या सल्लागार समितीचे अध्यक्ष विजय कुवळेकर हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. मनशक्ती प्रयोगकेंद्राचे कार्यकारी विश्वस्त प्रमोदभाई शिंदे आणि व्यवस्थापकीय विश्वस्त तसेच संशोधनप्रमुख गजानन केळकर हेही यावेळी उपस्थित होते.
मनशक्तीने आयोजित केलेली शिक्षण परिषद ही देशाचे भविष्य घडवण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. म्हणूनच ‘भारत भविष्य परिषद’ असा तिचा उल्लेख व्हावा, असे सांगून ते म्हणाले, तुमच्या उच्च महत्वाकांक्षा तुम्हाला त्याच्या पूर्ततेकडे घेऊन जातात. मात्र, महत्वाकांक्षा बाळगताना तुम्ही काहीही करू शकता, पण सगळेच काही करू शकत नाही, हेही लक्षात घ्या. नाहीतर मुलांची शक्ती नको त्या ठिकाणी खर्ची होते, असा सल्लाही त्यांनी उपस्थित शिक्षकांना दिला. शिक्षणाने माणसे सगळे भेद विसरून एकत्र काम करतात आणि त्यातून देशासाठी नवनिर्मिती साध्य होऊ शकते, हे सांगतानाच सध्या देश दुभंगतो आहे आणि अशा परिस्थितीत एकत्रित काम करून देशासाठी नवनिर्मिती करणे हे आपले ध्येय असले पाहिजे, अशी अपेक्षा डॉ. माशेलकर यांनी व्यक्त केली.
21 विचारवंत व मान्यवरांचा सहभाग
तीन दिवस चाललेल्या या शिक्षण परिषदेत तब्बल 21 विचारवंत आणि मान्यवर वक्त्यांनी माणूस घडवणारे शिक्षण कसे असावे, याबद्दल वेगवेगळय़ा अंगाने मार्गदर्शन केले. यात महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेडचे विवेक सावंत, सामाजिक कार्यकर्त्या रेणू गावस्कर, ज्ये÷ शिक्षणतज्ञ डॉ. पंडित विद्यासागर, ज्ये÷ अर्थतज्ञ डॉ. दीपक घैसास, ज्ये÷ शिक्षणतज्ञ रमेश पानसे, प्रवरानगरचे अर्थतज्ञ डॉ. यशवंत थोरात, डॉ. चंद्रशेखर देसाई, मानसोपचारतज्ञ डॉ. राजेंद्र बर्वे, डॉ. विदुला म्हैसकर, ज्ञानप्रबोधिनीचे डॉ. गिरीश बापट, शिक्षणतज्ञ हेरंब कुलकर्णी, प्रसिद्ध कवी प्रवीण दवणे आणि ज्ये÷ पत्रकार डॉ. सागर देशपांडे यांच्यासह अनेक मान्यवरांनी या परिषदेत सहभाग घेतला.