वार्ताहर / आवळी बुद्रुक
परिसरात पडलेल्या संततधार पावसामुळे राधानगरी तालुक्यातील दुर्गमानवाड- मिसाळवाडी या दरम्यान नवीन केलेल्या रस्त्याच्या बाजूपट्ट्या खचल्या आहेत. रस्त्याला तडे गेले असून या रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास रस्ता तुटू शकतो. रस्त्याचे काम निकृष्ट झाल्याने पहिल्या पावसात ही अवस्था झाली आहे.त्यामुळे हे रस्त्याचे काम त्वरित करावे अशी मागणी आरपीआय गवई गटाने केली आहे.
बबन गुरव यांच्या शेताला लागून असलेल्या या रस्त्याला पावसाने भेगा पडल्या आहेत.
आरपीआय गवई गटाचे तालुकाध्यक्ष व येथील माजी उपसरपंच डॉ.साताप्पा कांबळे, भीमराव कांबळे, रमेश कांबळे, विलास कांबळे, नितीन कांबळे, संदीप कांबळे,पांडुरंग गुरव यांनी निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी करून लगेच दुरुस्ती करावी. दुरुस्ती न केल्यास तीव्र आंदोलन करणार असल्याची माहिती त्यांनी पत्रकारांना दिली.