ग्रामस्थांचे तहसीलदारांना निवेदन
वार्ताहर /खानापूर
खानापूर तालुक्मयाच्या दुर्गम भागात अनेक गावे मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. सर्वसामान्यांचे जीवनोपयोगी असलेले रेशन वेळीच येथील लोकांना मिळत नाही. हेम्माडगा भागातील अनेक गावांना जंगली प्राण्यांच्या भीतीतून वाट काढून रेशनसाठी आठ ते दहा किलोमीटर प्रवास करावा लागतो. अशाप्रकारे हेम्माडगाजवळील जामगाव येथील रेशन धारकांनाही मोठी समस्या असून शासनाने गावातच रेशन वाटप हाती घेण्यात यावे, अशी मागणी करणारे निवेदन मंगळवारी तहसीलदार राजेंद्र जैन यांच्याकडे ग्रामस्थांनी सादर केले. निवेदनात म्हटले आहे की, खानापूर तालुक्मयाच्या दुर्गम भागात वसलेल्या जामगाव गावात जवळपास 450 लोकसंख्या असून 90 हून अधिक रेशनकार्ड आहेत.
परंतु सदर गावातील लोकांना हेम्माडगा या ठिकाणी दहा किलोमीटर पायपीट करून रेशनसाठी हेलपाटे घालावे लागत आहेत. कधी अंगठा लावण्यासाठी तर कधी रेशन आणण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. त्यामुळे येथील रेशनधारकांची हेळसांड होत असून प्रशासनाने या जामगाव गावातच महिन्यातून एक-दोन दिवस रेशन वाटप प्रक्रिया हाती घ्यावी, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. हेम्माडगा येथे जवळपासच्या अनेक गावांना संबंधित एकाच ठिकाणी नंदगड मार्केटिंग सोसायटीच्या मार्फत रेशन वाटप केले जाते. त्यामुळे लोकांना पायपीट करावी लागत आहे. यासाठी 90 हून अधिक रेशन कार्ड असलेल्या जामगाव गावातही महिन्यातून एक-दोन दिवस रेशन वाटपसाठी क्रम हाती घेण्यात यावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली. निवेदन देताना भाजप नेत्या धनश्री सरदेसाई, गावातील प्रति÷ित नागरिक नारायण गावकर, ग्राम पंचायत सदस्य दीपक गवाळकर, बळवंत कणकुंबकर, लक्ष्मण गावकर, विठोबा पारस्कर, मारुती सुखाये, महादेव आयर, लक्ष्मी दळवी, सविता सुखे यासह अनेक पुरुष व महिला मोठय़ा संख्येने उपस्थित होत्या.