कृतार्थ होऊनच राजा अंबरिष दुर्वास ऋषींची वाट पाहत होता नि इतक्मयात महषी दुर्वास आपल्या शिष्यांबरोबर शूचिर्भूत होऊन आले. राजाने भोजनाची सिद्धता केली नि महर्षींना भोजनाला बसण्याची विनंती केली; पण महर्षींना कळले की, राजाने व्रताची सांगता केली तेसुद्धा आपले भोजन होण्याआधी. दुर्वास ऋषी संतापले. ते राजाला शापवाणीने बोलू लागले, ‘राजन! तू एका महषीचा अपमान केला आहेस. आम्हाला तू भोजनाचा आग्रह केलास नि वाट न पाहता तू व्रताची सांगताही केलीस. राजन, तू घोर अपराध केला आहेस.’ असे रागाने म्हणून दुर्वास ऋषींनी डोके जोरजोरात हलवले. जटेतला एक केस जोरात उपटला. मंत्र म्हटले. त्या जटेचा एक राक्षस झाला. त्याच्या हातात तळपती तलवार होती. राक्षसाची जीभ बाहेर लवलवत होती. तो ताड्ताड् राजा अंबरिषच्या अंगावर चाल करून गेला. राजा अंबरिष शांत उभा होता.
त्याच्या तोंडात भगवान विष्णुचे नाव होते. तो भगवानांची करुणा भाकत होता. इतक्मयात राजाच्या पाठीशी सतत फिरणारे भगवान विष्णुंचे अदृश्य चक्र एकदम दृष्य झाले. जे जोरात फिरू लागले नि ते त्या राक्षसाच्या अंगावर गेले. राक्षसाचा शिरच्छेद झाला. ते दृश्य पाहून दुर्वास ऋषी एकदम पळायला लागले. त्यांच्यापाठोपाठ ते सुदर्शन चक्र गरागरा जाऊ लागले. दुर्वास ऋषी पुढे धावत आहेत आणि मागे चक्र. दुर्वास ऋषी पळत पळत ब्रह्मदेवाकडे आले. दुर्वास ऋषींना पाहून ब्रह्मदेवांना सारा प्रकार लगेचच कळला. ब्रह्मदेव दुर्वासांना म्हणाले, ‘मुनीवर! भगवान विष्णुच्या परमभक्ताचा तुम्ही अकारण अपमान केला आहे. प्रत्यक्ष सुदर्शन चक्र राजा अंबरिषाचे रक्षण करण्यासाठी भगवानाने आपल्या परमभक्ताला अर्पण केलेले आहे. तो भक्ताच्या पाठीशी उभा आहे. तुला मी वाचवू शकत नाही. तू भगवान शंकराकडे जा.’
दुर्वास ऋषी धावत धावत कैलास पर्वतावर गेले. तेथे त्यांनी भगवान शंकराला प्रणिपात केला. त्याला शरण गेले. तेव्हा भगवान शंकराने ऋषीवरांना तेच पुन्हा सांगितले. सुदर्शनचक्राच्या प्रचंड वेगाने दुर्वास ऋषी चक्रावून गेले होते. ते क्षीरसागरात शेषावर बसलेल्या विष्णुकडे गेले. विष्णुने दुर्वासांचे हसून स्वागत केले आणि पुन्हा तेच सांगितले की, चक्रापासून मी तुझे रक्षण करू शकत नाही. तू राजा अंबरिषाकडे जा. त्याची क्षमा माग. दुर्वास ऋषी पुन्हा राजा अंबरिषाकडे आले. राजा अंबरिष तेव्हासुद्धा भगवान विष्णुच्या नामस्मरणात दंग होता. एक वर्ष उलटले होते. राजाने भोजन घेतलेले नव्हते. ते पाहून दुर्वास ऋषी खजील झाले. तो दिवस पुन्हा द्वादशीचाच होता. दुर्वास ऋषींना पाहून राजा अंबरिषाने त्यांचे पुन्हा मनःपूर्वक स्वागत केले.
त्यांना व्रताच्या सांगतेचे कारण समजावून सांगितले. राजा अंबरिषाची विष्णुभक्ती पाहून दुर्वास ऋषी राजावर प्रसन्न झाले. त्यांनी राजाला विनंती केली. राजाने ते चक्र मागे घेतले. तेव्हा भगवान विष्णुने दोघांवर पुष्पवृष्टी केली. दुर्वास ऋषींनी राजाबरोबर भोजन घेतले. राजाच्या व्रताची सांगता झाली. नंतर दुर्वास ऋषी आल्या पावली पुन्हा परत गेले. परमभक्त राजा अंबरिष पुन्हा विष्णुभक्तीत तल्लीन झाला.
Ad. देवदत्त परुळेकर