ऑनलाईन टीम / तरुण भारत
गेल्या काही दिवसांपासुन महाराष्ट्रातील नेते एकमेकांवर आरोप – प्रत्यारोप करत आहेत. या आरोप – प्रत्यारोपांचा दर्जा इतका खालावलेला आहे कि, देशाच्या राजकारणाला दिशा देणारा महाराष्ट्रातील नेते एकमेकांचे व्यक्तीगत टीका ृ टीप्पणी करत आहेत. त्याच्या ही पुढे जात टीका करु लागल्याने महाराष्ट्रातील जनता ही या नेत्यांना लोकांच्य़ा समस्यांपेक्षा टीका – टीप्पणी करणे आवश्यक असल्याचं म्हटलं जाऊ लागलं.
राज्यातील जनता ही या नेत्यांच्या अनावश्यक उद्योगाला कंटाळल्याची विधाने करु लागली मात्र तरी ही नेत्यांनी यातुन आज ही कोणताच बोध न घेता आरोप – प्रत्यारोप सुरुच ठेवले आहेत. याच पार्श्वभुमीवर राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना, फडणवीस यांनी गिरीश महाजन यांनी अडकवण्याचा डाव सुरू असल्याचे सांगत विधानसभा अध्यक्षांना वेगवेगळ्या फुटेजने भरलेला एक पेनड्राईव्ह दिला होता. त्यानंतर आज देवेंद्र फडणवीस यांनी दोन तास मुंबई सायबर पोलिसांकडून चौकशी करण्यात आली आहे. दरम्यान, आता भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मोठे विधान केले आहे. त्यांनी उद्या किंवा परवा आणखी एक व्हिडिओ बॉम्ब येणार असल्याचे म्हटले आहे. तसेच हा व्हिडिओ पहिल्यापेक्षाही स्ट्राँग असल्याचे म्हटले आहे.
“केंद्रीय तपास यंत्रणांकडून तुम्ही आम्हाला त्रास देता म्हणून, आम्ही तुम्हाला त्रास देतो असे सध्या राज्यात सुरू आहे. देवेंद्र फडणवीस यांनी एक व्हिडिओ बॉम्ब टाकला. एका व्हिडिओ बॉम्बमुळे सगळे चिडीचूप झाले आहेत. दुसरा व्हिडिओ उद्या-परवा येणार आहे. दुसरा व्हिडिओ पहिल्यापेक्षाही खुप स्ट्राँग असेल. फडणवीस यांच्या पाठीमागे भारतीय जनता पक्ष आणि राज्यातील जनता आहे,” असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. यामुळे भाजपच्या या भुमिकेवर महाविकास आघाडीचे कोणत्या नेत्यांवर आरोप होणार आहे. याची उत्सुकता जनतेला आता यात रस उरला नसला तरी राजकिय पक्षांच्या गोटात हे मुद्दे खमंगपणे चर्चीले जात आहेत.