रत्नागिरी जिह्यात विषाणूने आपले स्वरूप बदलले असून आता लागण वेग कमालीचा वाढला आह़े या पार्श्वभूमीवर रोगाच्या नियंत्रणासाठी नवे धोरण आखणे गरजेचे आह़े
जागतिक स्तरावर प्रश्नचिन्ह बनून राहिलेल्या कोरोना महामारीचे रुग्ण कोकणात कमी होताना दिसत नाहीत़ याबाबत आरोग्य यंत्रणा सतर्क असून कार्यवाही सुरू आहे, अशी सरकारी छापाची उत्तरे दिली जात आहेत़ मात्र रत्नागिरी जिह्यात विषाणूने आपले स्वरूप बदलले असून आता लागण वेग कमालीचा वाढला आह़े तसे प्रयोग शाळेतील पुरावे पुढे आले आहेत़ या पार्श्वभूमीवर रोगाच्या नियंत्रणासाठी नवे धोरण आखणे गरजेचे आह़े
सध्या रत्नागिरी जिह्यात आतापर्यंत 61 हजारपेक्षा जास्त लोकांना या रोगाची बाधा झाली आह़े 1738 लोकांचे मृत्यू झाले आह़े जिह्याचा मृत्यूदर 2.85 टक्के इतका आह़े तो देशाच्या तसेच राज्याच्या सरासरी दरापेक्षा अधिक आह़े आतापर्यंत 54 हजार लोक बरे झाले आहेत़ बरे होण्याचे प्रमाण 88 टक्के पर्यंत पोहोचले आह़े हे प्रमाण राज्याच्या तुलनेत कमी आह़े
सिंधुदुर्ग जिह्यात देखील कोरोना रुग्णांचे प्रमाण लक्षणीय आह़े या जिह्यात आतापर्यंत 41 हजार पर्यंत रुग्णसंख्या पोहोचत आह़े 34 हजार रुग्ण बरे झाल़े मृत्यूंची संख्या 1 हजार 30 एवढी आह़े सध्याच्या परिस्थितीत या जिह्यात सुमारे साडेपाच हजार सक्रीय रुग्ण आहेत़ त्यापैकी 313 रुग्णांची प्रकृती चिंताजनक असून त्यातील 45 रुग्ण व्हेंटीलेटरवर उपचार घेत आहेत़
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग दोन्ही जिह्यांची लोकसंख्या विचारात घेता गतीने रोगप्रसार होत आह़े वर्षभरापेक्षा अधिक कालावधी उलटून गेला असून आरोग्य यंत्रणेची काही निरीक्षणे तयार झाली आहेत़ वेगवेगळ्या ठिकाणी आलेले अनुभव आणि तज्ञांची मते यामुळे आता साथीविषयीचे निर्णय अधिक व्यवहार्य ठरण्याची शक्यता आह़े राज्यपातळीवरचे तज्ञ अधिकाऱयांचा व वैद्यकांचा चमू रोगाच्या वेगवान प्रसाराबद्दल सचिंत आह़े प्रयोगशाळा आणि समाजविज्ञान संस्थांकडील अनुमान गृहितकांचे आराखडे आरोग्य यंत्रणेच्या मदतीस येत आहेत़
एवढय़ातच भारतातील कोविड रोगजंतुंमध्ये जनुकीय बदल झाला आहे काय, यावर भारत सरकारने शोध मोहीम राबवल़ी प्रत्येक जिह्यातील 100 नमुने घेऊन त्याचा अभ्यास करण्यात आल़ा रत्नागिरी जिह्यातील संगमेश्वर तालुक्यात 9 रुग्णांमध्ये कोरोना विषाणुंच्या जनुकीय बदलांची नोंद केंद्रीय प्रयोग शाळेने केली आह़े डेल्टा प्लस नावाने त्याला ओळखले जात़े हा जनुकीय बदल समाजासाठी अधिक आव्हानात्मक आह़े त्याचा प्रसार वेगवान होत आह़े राज्यातील डेल्टा प्लसचा पहिला बळी रत्नागिरी जिह्यात नोंदवला गेल़ा 80 वर्षाच्या महिलेचा मृत्यू जनुकीय बदल झालेल्या कोरोनामुळे झाल्याचे आरोग्य यंत्रणेचे म्हणणे आह़े
हा रोग ज्या वेगाने पसरत आह़े त्याचा नेमका अंदाज लावणे कठीण आह़े असे रत्नागिरीतील जुने वैद्यक अनिल पाटील यांनी म्हटले आह़े आपण रुग्णसंख्या विचारात घेताना तपासणीच्या टप्प्यात आलेल्या लोकांबद्दल बोलत असत़ो समाजात सध्या अनेकांना लागण झालेली असू शकते आणि उपचाराशिवाय ते बरेही झालेले असू शकतात़, असे त्यांचे म्हणणे आह़े त्यामुळे नव्या डेल्टा प्लस व्हेरियंटची लागण कोठवर झाली आहे त्याचे मोजमाप करणे अधिक अवघड आह़े कदाचित त्यामुळेच रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिह्यातील कोरोना सहजासहजी आटोक्यात येताना दिसत नाहीत़ राज्यातील अगदी मुंबई-पुण्यातील कोरोनाचा बाधित दर कमी येत आह़े त्याचवेळी कोकणातील बाधितांचा दर मात्र कमी येत नसल्याने नेमके काय करावे असा प्रश्न आरोग्य यंत्रणेसमोर पडला आह़े
रत्नागिरी जिह्यात केवळ डेल्टा प्लस रुग्ण आढळलेल्या जागा प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आलेल्या नाहीत़ आता पुन्हा एकदा अधिक रुग्णसंख्या असलेले सर्व ठिकाणी प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करण्याचे धोरण प्रशासनाने स्वीकारले आह़े यामुळे कोरोना नियंत्रणात येईल, अशी शक्यता व्यक्त होत आह़े काही गावांमध्ये पुढाऱयांच्या छुप्या आशीर्वादाने दणदणीत लग्न समारंभ पार पडत आहेत़ 25 लोकांच्या उपस्थितीच्या मर्यादा कितीतरी पटीने ओलांडल्या जात आहेत़ याशिवाय राजकीय पक्ष देखील त्यांचे कार्यक्रम व आंदोलने धडाक्यात करत आहेत़ सामाजिक अंतराचा फज्जा त्यामुळे उडत आह़े त्याचे भान राहिलेले नसल्याने रोग प्रसाराची शक्यता वाढली आह़े कोरोना काळजी पेंद्रात वाढदिवसानिमित्त वस्तू वाटप, रुग्णांना खाद्य वाटप, कोविड केंद्राला सुविधांची देणगी असे एक ना अनेक मुद्दे राजकीय इच्छा पोटात बाळगून वावरणाऱया लोकांना आकर्षित करत आहेत़ अशा कार्यक्रमांचे फोटो काढून ते प्रसिद्धी देण्यासाठी जणूकाही स्पर्धा लागली आह़े कोविड केंद्राचे उद्घाटन हाही मुद्दा ऑनलाईन प्रकारे करणे शक्य आह़े त्याचा विचार राजकीय नेत्यांनी केला पाहिज़े रत्नागिरी जिह्यात गेल्या अडिच महिन्यात 3 हजार बालकांना कोरोनाची बाधा झाली आह़े यातील बहुसंख्य मुले उपचारानंतर घरी परतली आहेत़ बालकांचा बाधित दर लक्षात घेता लाटेचा तिसरा टप्पा सुरू झाला की काय, अशी साधार भीती व्यक्त होत आह़े दुसरी लाट संपण्यापूर्वी तिसरीचे तडाखे मात्र लोकांना बसू लागले आहेत़ बालकांना बाधित झाल्यानंतर उपचार देता यावेत, यासाठी प्रशासनाने काही तयारी केली आह़े मात्र सगळ्या लोकांनी बाधेपासून दूर राहण्यासाठी पुरेशी काळजी घेतलेली बऱी
सुकांत चक्रदेव