प्रतिनिधी/सातारा
कडक लॉकडाऊन सुरु केल्यानंतर पोलिसांनी पहिल्या दिवशी व त्या अगोदरही काही दिवस कारवाईंचा धडाका लावला होता. त्यामुळे लॉकडाऊनच्या पहिल्या दिवशी सातारकरांनी पुन्हा गतवर्षीच्या लॉकडाऊनमधील नीरव शांतता अनुभवली. मात्र, दुसऱया दिवशी सकाळ ते दुपारपर्यंत काळ सोडल्यास पुन्हा सर्व पाँईटसवरील बंदोबस्तात ढिलाई आल्याने रस्त्यावर नागरिकांची वर्दळ दिसू लागली होती.
सातारा शहर व तालुका हॉटस्पॉट ठरल्याने येथील संसर्ग साखळय़ा तोडण्याचे मोठे आव्हान सर्वांसमोरच आहे. त्यासाठी पोलीस दलाच्या खांद्यावर प्रशासनाने मोठी जबाबदारी सोपवली आहे. गर्दी टाळणे, संपर्क टाळणे, रस्त्यावर न येणे आणि घरात बसून कोरोनाविरुध्दची लढाई लढण्यासाठी लोकांना घरात बसवण्याचे आव्हानात्मक काम पोलीस दल पार पाडत आहे.
लॉकडाऊनच्या पहिल्या दिवशी पोलीस दलाने कारवाई करतानाच अँटीजन टेस्ट करुन नागरिकांना तपासण्यांचे भय दाखवले. धक्कादायक म्हणजे रस्त्यावर केलेल्या चाचण्यांमध्ये तब्बल 18 जण पॉझिटिव्ह आले आहेत. आता उर्वरित दिवसात पोलीस दलाने कडक भूमिका ठेवून कडक राहण्याची गरज असताना लॉकडाऊनच्या दुसऱया असंख्य सातारकर घरात बसले असले तरी बंदोबस्तात ढिलाई आल्याचा गैरफायदा घेत काही सातारकर रस्त्यावर फिरु लागल्याचे दृश्यही पहावयास मिळाले.