जिल्हाधिकाऱयांनी शनिवारी केली मतदान केंद्रांची पाहणी
प्रतिनिधी/ बेळगाव
पहिल्या टप्प्यातील निवडणूक पार पडल्यानंतर रविवार दि. 27 रोजी दुसऱया टप्प्यातील ग्राम पंचायतींच्या निवडणुका होत आहेत. सकाळी 7 ते सायंकाळी 5 पर्यंत मतदान होणार आहे. एकूण 218 ग्राम पंचायतींसाठी ही निवडणूक होणार आहे. जिल्हा प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली असून बुधवार दि. 30 रोजी दोन्ही टप्प्यातील निवडणुकीची मतमोजणी होणार आहे.
दुसऱया टप्प्यामध्ये सौंदत्ती, रामदुर्ग, चिकोडी, निपाणी, अथणी, कागवाड आणि रायबाग या ग्राम पंचायतींची निवडणूक होत आहे. एकूण 3 हजार 936 सदस्य संख्येसाठी 9 हजार 472 जण रिंगणात आहेत. ग्राम पंचायतीची निवडणूक ही अत्यंत चुरशीने होत असते. पहिल्या टप्प्यामध्ये 82 टक्के मतदान झाले आहे. त्यामुळे दुसऱया टप्प्यातील हे मतदानही 80 टक्क्मयांपेक्षा अधिक होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
सौंदत्ती तालुक्मयातील एकूण 40 ग्राम पंचायतींची निवडणूक होत आहे. तालुक्यात 657 सदस्य संख्येसाठी 1600 जण रिंगणात आहेत. रामदुर्ग तालुक्मयातील 33 ग्राम पंचायतींच्या 520 जागांसाठी 1384 जण रिंगणात आहेत. चिकोडी तालुक्मयातील 36 ग्राम पंचायतींच्या 667 जागांसाठी 1628 जण रिंगणात आहेत. निपाणी तालुक्मयातील 27 ग्राम पंचायतींच्या 498 जागांसाठी 1261 जण रिंगणात आहेत. अथणी तालुक्मयातील 41 ग्राम पंचायतींच्या 741 जागांसाठी 1735 जण रिंगणात आहेत. कागवाड तालुक्मयातील 8 ग्राम पंचायतींच्या 207 जागांसाठी 468 जण रिंगणात आहेत. रायबाग तालुक्मयातील 33 ग्राम पंचायतींच्या 446 जागांसाठी 1396 जण रिंगणात आहेत.
या सर्व तालुक्मयातील ग्राम पंचायतींच्या निवडणुकीची तयारी पूर्ण झाली असून रविवारी सकाळी 7 पासूनच मतदानाला सुरुवात होणार आहे. एकूण 9 हजार 472 जण रिंगणात आहेत. त्यामुळे या निवडणुकीतही मोठी चुरस निर्माण झाली आहे. मतपत्रिकेद्वारे हे मतदान होत आहे. त्यामुळे बराच उशीर लागणार आहे. ग्राम पंचायत अखत्यारित ही निवडणूक होत आहे तर तालुक्मयामध्ये मतमोजणी होणार आहे.
जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी चिकोडी आणि रायबाग येथे भेट देऊन पाहणी केली. यावेळी अधिकाऱयांना निवडणूक अत्यंत शिस्तबद्धरीत्या आणि नियमांचे पालन करत पार पाडण्यासाठी सतर्क रहा, असे त्यांनी सांगितले. तालुक्मयातील स्ट्राँगरुमनाही त्यांनी भेटी देऊन पाहणी केली आहे. बुधवार दि. 30 रोजी मतमोजणी होणार आहे. यावेळी संपूर्ण जिल्हय़ातील मतमोजणी होणार आहे. चौदा तालुक्मयातील ही मतमोजणी होत असल्यामुळे संपूर्ण जिल्हय़ातच पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.