शेवटच्या दिवशी 6 हजार 288 अर्ज दाखल, शनिवारी माघारीचा दिवस
प्रतिनिधी/ बेळगाव
पहिल्या टप्प्यातील निवडणूक 22 डिसेंबर रोजी होत आहे. दुसऱया टप्प्यातील निवडणूक 27 डिसेंबर रोजी होत आहे. दुसऱया टप्प्यामध्ये 218 ग्राम पंचायतींची निवडणूक होत असून एकूण 3 हजार 936 सदस्य संख्येसाठी 9 हजार 89 अर्ज दाखल झाले आहेत. शनिवार दि. 19 रोजी माघार घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यानंतर या निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.
दुसऱया टप्प्यामध्ये सौंदत्ती, रामदुर्ग, चिकोडी, निपाणी, अथणी, कागवाड, रायबाग या सात तालुक्मयांतील ग्राम पंचायतींची निवडणूक होत आहे. सर्वात जास्त अथणी तालुक्मयामध्ये अर्ज दाखल झाले आहेत. त्या खालोखाल रामदुर्ग तालुक्मयात अर्ज दाखल करण्यात आले आहेत. सर्वात कमी कागवाड तालुक्मयामध्ये अर्ज दाखल झाले आहेत.
दुसऱया टप्प्यातील निवडणूक प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. अर्ज माघारीनंतर प्रचाराला जोर येणार असून आता संपूर्ण जिल्हाच निवडणुकीच्या रंगात रंगला असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. पहिल्या टप्प्यातील निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. सकाळपासूनच प्रचाराला सुरुवात केली जात आहे. आता दुसऱया टप्प्यातीलही निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली असून सर्वत्र निवडणुकीची धामधूम सुरू आहे.
दुसऱया टप्प्यामध्ये 4 हजार 904 पुरुष उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. 4 हजार 185 महिला उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. जवळपास पुरुषांबरोबरच महिलाही निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत.