प्रतिनिधी/ बेळगाव
ग्रामपंचायतींसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान मंगळवार 22 रोजी होणार आहे. दुसऱया टप्प्यातील मतदानासाठी प्रशासनाने तयारी केली असून रविवारी जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी चार तालुक्मयांना भेटी देऊन तयारीची पाहणी केली.
अथणी, कागवाड, चिकोडी, निपाणी येथे भेटी देऊन जिल्हाधिकाऱयांनी अधिकाऱयांशी चर्चा केली व तयारीसंबंधीची माहिती घेतली. निवडणूक कर्तव्यासाठी नियुक्त केलेल्या अधिकारी व कर्मचाऱयांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्यांच्याशीही संवाद साधून निवडणूक प्रक्रिया सुसूत्रपणे पार पडावी, यासाठी सर्व खबरदारी घेण्याची सूचना जिल्हाधिकाऱयांनी केली.
ग्रामीण भागात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चुरस निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत कोणत्याही प्रकारच्या गैरप्रकारांना थारा देऊ नये, नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक असावी. रविवार 27 रोजी दुसऱया टप्प्यातील मतदान होणार आहे. निवडणूक नियमांसंबंधी अधिकारी व कर्मचाऱयांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. तरीही मनात संशय किंवा प्रश्न असले तरी वरि÷ अधिकाऱयांशी संपर्क साधून संशय निवारण करून घ्यावा, असा सल्लाही जिल्हाधिकाऱयांनी कर्मचाऱयांना दिला.