सेन्सेक्स 187 अंकांनी मजबूत : वित्तीय कंपन्यांचा सकारात्मक प्रभाव
वृत्तसंस्था/ मुंबई
चालू आठवडय़ात दुसऱया दिवशी मंगळवारी शेअर बाजार तेजीत राहिला असल्याचे पाहायला मिळाले. मागील आठवडय़ापासून पाहता सलग पाचव्या दिवशी सेन्सेक्सने तेजी राखल्याचे पहावयास मिळाले आहे. कारण गेले काही दिवस भारत -चीन यांच्यातील सीमेवरील संघर्षामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते आणि याचा अप्रत्यक्षपणे परिणाम देशातील क्यापारावर होत होता. परंतु आता दोन्ही देशांमध्ये सकारात्मक चर्चा सुरु असल्याने सीमेवर शांतता निर्माण करण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. यामुळे मंगळवारी सेन्सेक्स 187 अंकांनी वधारत बंद झाला आहे.
दिवसभरात वित्तीय कंपन्यांचे समभाग तेजीत राहिल्याने वीज आणि अन्य क्षेत्रातील कंपन्यांमध्ये नुकसानीची भरपाई झाली. त्यानंतर मात्र चढउतारासोबत दिवसअखेर सेन्सेक्स 187.24 अंकांनी वधारुन निर्देशांक 36,674.52 वर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 36 अंकांनी वधारुन निर्देशांक 10,799.65 वर बंद झाला.
प्रमुख कंपन्यांमध्ये बजाज फायनान्सचे समभाग सर्वाधिक म्हणजे 8 टक्क्मयांनी तेजीत राहिले. यासोबतच इंडसइंड बँक, बजाज फिनसर्व्ह, इन्फोसिस, आयसीआयसीआय बँक, ऍक्सिस बँक आणि एचसीएल टेक यांचेही समभाग तेजीसोबत बंद झाले आहेत. अन्य कंपन्यांमध्ये एनटीपीसी, आयटीसी, पॉवरग्रिड कॉर्प आणि टाटा स्टीलचे समभाग नुकसानीत राहिले आहेत.
मंगळवारी गुंतवणूकदारांनी जागतिक बाजारामधील विदेशी भांडवलाचा प्रवाह सुरु ठेवला आहे. तसेच दुसरीकडे संपूर्ण भारतासाठी महत्त्वाचा असणाऱया मान्सूनची सुरु असणारी योग्य वाटचाल भारतीय शेअर बाजारातील कामगिरीवर सकारात्मक परिणाम करणारी ठरली असल्याचे अभ्यासकांनी म्हटले आहे. अस्थिर आकडेवारीनुसार विदेशी संस्थांच्या गुंतवणुकीच्या मदतीने सोमवारी भांडवली बाजारात निव्वळ खरेदीदार राहिले असून यावेळी जवळपास 348.35 कोटी रुपये मूल्याचे समभाग खरेदी करण्यात आले आहेत.