शुक्रवारी 2,037 जण संसर्गमुक्त : 110 जणांचा मृत्यू
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्यात कोरानाबाधितांचा आकडा 85 हजार पार झाला असून शुक्रवारी देखील 5 हजारहून अधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे मागील 24 तासांत 2,037 जण संसर्गमुक्त होऊन घरी परतले आहेत. तर दिवसभरात 110 रुग्णांचा बळी गेला आहे. गुरुवारी राज्यात 5,030 रुग्ण आढळले होते. तर शुक्रवारी 5,007 रुग्ण सापडले आहेत.
राज्यात आतापर्यंत 85,870 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी 31,347 जण संसर्गमुक्त झाले आहेत. तर 1,724 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या 52,791 रुग्णांवर विविध इस्पितळांमध्ये उपचार सुरू आहेत. शुक्रवारी 29,819 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. आतापर्यंत 11,10,497 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे.
मागील चोवीस तासांमध्ये बेंगळूर शहर जिल्हय़ात 2,267, म्हैसूरमध्ये 281, उडुपीमध्ये 190, बागलकोट 184, मंगळूर 180, धारवाड 174, गुलबर्गा 159, विजापूर 158, बळ्ळारी 136, हासन 118, बेळगाव 116, गदग 108, रायचूर 107, चिक्कबळ्ळापूर 92, कारवार 88, बिदर 87, दावणगेरे 77, शिमोगा 67, तुमकूर आणि हावेरीत प्रत्येकी 59, मंडय़ा 57, यादगीर 53, कोप्पळ 39, कोलार 36, चामराजनगर 33, चिक्कमंगळूर 28, बेंगळूर ग्रामीण 26, चित्रदुर्ग 13, रामनगर 12 तसेच कोडगू जिल्हय़ात 3 नव्या रुग्णांची भर पडली आहे.