प्रतिनिधी / बेळगाव
मच्छे (ता. बेळगाव) येथे शनिवारी दुपारी दोन महिलांचा भीषण खून झाला आहे. डोळय़ात मिरचीपूड टाकून तिक्ष्ण हत्याराने भोसकून त्यांचा खून करण्यात आला आहे. दुहेरी खुनाच्या या प्रकाराने परिसर हादरले आहे.
राजश्री (वय 21) व रोहिणी (वय 22, दोघीही रा. काळेनट्टी) अशी त्यांची नावे असून खुनानंतर मारेकऱयांनी तेथून पलायन केले आहे. घटनेची माहिती समजताच कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांनी घटनास्थळी धाव घेतली असून पुढील तपास सुरू आहे.