दीर्घ काळ प्रतीक्षेत असलेले गोहत्या प्रतिबंध विधेयक बुधवारी म्हणजे दि. 9 डिसेंबर रोजी कर्नाटक विधिमंडळात संमत झाले. पण दूध न देणाऱया गाईंचे काय करायचे याबाबतची माहिती नसल्यामुळे सर्वत्र होणारा गैरसमज आणि वाद तेथेही रंगला. गाय किंवा बैल यांच्या दहा किलो शेणातून एक एकर शेती होते. हा प्रयोग मोठय़ा प्रमाणावर यशस्वी झाला आहे. एवढेच नव्हे तर शेणाच्या पोकळ गोवऱया बनवल्या तर त्याचा घरगुती इंधनासाठीही उपयोग होतो. त्याचा गॅसपेक्षाही कमी खर्च येतो आणि प्रदूषणही कमी होते, या बाबी दिल्ली आयआयटीच्या संशोधनातून पुढे आल्या आहेत. ती माहिती असती तर कर्नाटक विधिमंडळात जो वाद रंगला तो रंगला नसता. तरीही कर्नाटक विधिमंडळाने हे विधेयक संमत केले याबद्दल मनापासून अभिनंदन. गोहत्या करणाऱयास 3 ते 7 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा देण्याची तरतूद करण्यात आली आहे. ध्ंड 50,000 पासून ते 5 लाखांपर्यंत नेण्यात आला आहे. 10 वर्षांपूर्वी येडियुराप्पा यांनी मांडलेल्या विधेयकातही हा दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हा होता. पण या वषीच्या विधेयकात तो दखलपात्र आणि जामीनपात्र गुन्हा ठरविण्यात आला आहे. या विधेयकाला विरोधी पक्षांनी विरोध केला.
या विधेयकावर गेले दोन महिने राजकीय वर्तुळात आणि प्रसारमाध्यमांतही चर्चा सुरू होती. ‘दूध न देणाऱया जनावरांचे काय करायचे?’ असा मुद्दा काँग्रेस नेते आणि विरोधी पक्ष प्रमुख सिद्धरामय्या यांनी उपस्थित केला होता आणि अशा दूध न देणाऱया गाई-म्हशी आपण संघ कार्यालयासमोर सोडून देऊया, असा सल्लाही दिला होता. त्यावर भाजप नेते ईश्वरप्पा यांनी अशी प्रतिक्रिया व्यक्त केली, की ‘हा समाज गाईला आईचा दर्जा देतो, अशा स्थितीत काँग्रेस नेते सिद्धरामय्या हे आपल्या आईलाही दूध न देणाऱया गाईप्रमाणे रस्त्यावर सोडून देतील का?’
यापूर्वी असे विधेयक दोन वेळा संमत करण्यात आले होते. इ. स. 1964 मध्ये संमत झालेल्या विधेयकात गाय आणि म्हशीचे रेडकू यांच्या हत्येवर बंदी होती. पण बैल, म्हैस आणि रेडा यांच्या हत्येला मान्यता होती. पण ती जनावरे 12 वर्षावरील असावीत आणि नव्याने विते करण्यासाठी उपयोगाची नाहीत किंवा आजारी आहेत, असे सर्टिफिकेट घेण्याची गरज होती. पण व्यवस्थित गोहत्या बंदी होण्यास ते विधेयक अपुरे पडले. यानंतर 2010 मध्ये दुसरे विधेयक संमत करण्यात आले. ते विधेयकही विद्यमान मुख्यमंत्री येडियुराप्पा असतानाच संमत करण्यात आले होते. पण नंतर काँग्रेसचे सिद्धरामय्या मुख्यमंत्री असताना ते 2013 मध्ये स्थगित ठेवण्यात आले. बुधवारी संमत झालेल्या विधेयकात गाय, म्हैस, बैल आणि रेडा यावर बंदी आहे. तेरा वर्षावरील म्हैस आणि रेडा यांच्या हत्येच्या मागणीस काही अटीवर मान्यता देण्यात आली आहे. पण त्यासाठी ती मान्यता मिळवावी लागेल. 1964 साली संमत झालेल्या विधेयकात 6 महिन्यांची शिक्षा आणि 1,000 रु. दंड होता तर 2010 मध्ये झालेल्या कायद्यात 1 ते 7 वर्षे सश्रम कारावास आणि एक लाख रु. दंड अशी तरतूद होती.
तिरुपती देवस्थानचा उपक्रम
तिरुमला तिरुपती देवस्थानने दक्षिण भारतातील प्रत्येक मंदिराला एक गाय भेट देण्याचा निर्णय घेतल्याने गाय विषयाची माहिती अनेकांना होण्यास मदत होईल. ही गाय प्रत्यक्ष देवस्थानाच्यावतीनेही देण्यात येईल किंवा भक्त मंडळींना अशा पद्धतीने मंदिरांना गोदान करावे, असे आवाहन करण्यात येईल. गाईच्या संदर्भात तिरुमला तिरुपती देवस्थान सतत काही ना काही कार्यक्रम राबवत असते. देशात सर्वत्र गोहत्या बंदी व्हावी म्हणून या देवस्थानने एक मोठी चळवळही सुरू केली आहे. त्याचप्रमाणे ज्या मंदिर संस्थांकडे गाई आहेत, त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याची व्यापक योजनाही या संस्थेने निर्माण केली आहे. नुकताच विजयवाडा येथील कनक दुर्गा मंदिरात या कार्यक्रमाचा आरंभ झाला. या योजनेतून तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यातील प्रत्येक मंदिराला गाय मिळेल, असा कटाक्षाने प्रयत्न करण्यात येईल.
आंध्र प्रदेश धर्मादाय विभागाचे मंत्री वेलाप्पली श्रीनिवास याप्रसंगी बोलताना म्हणाले, गाईची काळजी घेणे हे आपल्या सर्वांचे काम आहे, त्यामुळे एका मंदिराला दिलेली गाय ही फक्त मंदिरासाठी नसून सर्वांसाठी आहे. तिरुमला तिरुपती देवस्थानाचे अध्यक्ष वाय. व्ही. रेड्डी याप्रसंगी बोलताना म्हणाले, ‘कोणत्याही मंदिरात गाय असणे आणि गाईला चारा मिळणे हे तर महत्त्वाचे आहे, पण संस्काराचे विश्व अधिक व्यापक करण्यासाठी जेथे गाय तेथे दररोज प्रार्थना अशी व्यवस्था आपण निर्माण केली पाहिजे. आंध्र प्रदेशमध्ये हा उपक्रम अनेक ठिकाणी राबवलाही जातो. पण तो सर्वत्र राबवला जाण्यासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे.
दक्षिणेतील 4 राज्यातील प्रत्येक मंदिरात गाय असण्याच्या उपक्रमाला तेथील महत्त्वाचे देवस्थान तिरुमला तिरुपती देवस्थान आणि राज्य सरकारे महत्त्व देत आहेत, या निमित्ताने मंदिर म्हणजे गाईचे स्थान ही जशी पद्धत आहे, त्याचप्रमाणे मंदिर म्हणजे यज्ञशाळा ही संकल्पनाही आहे. या निमित्ताने त्याचीही आठवण करून देणे आवश्यक आहे. अगदी 15-20 वर्षापर्यंतचा काळ असा होता, की गाई सांभाळणे या पद्धती म्हणजे अंधश्रद्धा वाटायची. गाईचा नमस्कार करण्यापलीकडे काहीच उपयोग नाही, असे मानले जायचे. पण आता अवघ्या 10 किलो शेणात एक एकर शेती शेती होते आहे. कॅन्सरसारखे रुग्ण बरे होत आहेत. एवढेच नव्हे तर त्यासाठी मोठी हॉस्पिटल्सही निघत आहेत. असे व्यवहारी जगातील याचे फायदे आणि आध्यात्मिक, धार्मिक क्षेत्रातील फायदे पुढे येत आहेत. यज्ञ संस्थाही गाईचे तूप, शेणी यावर उभी आहे. त्यामुळे गो-पालनाबरोबर यज्ञ संस्थेचाही आग्रह धरला गेला पाहिजे.
न्यूझीलंडमधील एका मोठय़ा गोशाळेचा मालक ड्रिक वॅन डेन पेन याचा नुकताच गेल्या 40 वर्षात5 लाख गाईची कृत्रिम रेतन पद्धतीने निर्मिती केल्याबद्दल सन्मान करण्यात आला. कोणतीही गोष्ट विक्रमी स्वरुपाने पुढे आली की त्याचा सत्कार करणे ही अलीकडे सर्वत्र दिसणारी बाब आहे. पण एखादी बाब सरळ पद्धतीने स्वीकारल्यावरही अधिक उपयोग होत असताना कृत्रिम किंवा विकृत पद्धतीने वापरणे हे समाजाला घातक असते. त्याचा परिणाम एका व्यक्तीला नव्हे तर साऱया समाजालाच सहन करावा लागतो. कृत्रिम पद्धतीने जनावरांची गर्भधारणा करण्याची पद्धत सुरू होऊन 240 वर्षे होऊन गेली. आता तर हे तंत्रज्ञान रेतन आणि बीजांड यांचा प्रयोगशाळेतच संयोग घडवून तो तेथेच काही आठवडे वाढवून देऊन नंतर तो अन्य मादी प्राण्याच्या गर्भात सोडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यामुळे ती मादी फक्त तिच्या पोटातील गर्भाची माता तीच नाही, अशी परिस्थिती निर्माण होते. याचे काही उपयोग आहेत पण त्यातून ज्या समस्या निर्माण होत आहेत, त्याकडे बघितल्यास आपण प्रगतीकडे न जाता अधोगतीकडे जात आहोत, असे स्पष्ट दिसते. कारण क्रॉसब्रिड गाईच्या दुधात हिस्टॅडिन नावाचे एक सौम्य विष असते, त्याचा परिणाम ते वापरणाऱयावर होत असतो. त्याखेरीज अनेक प्रकारचे सौम्य दोष त्यात असतात. त्याचा लगेच तोटा होतो, असे नाही, पण हळूहळू त्याचा परिणाम होतच असतो.
कृत्रिम रेतन ही तर भारताची सर्वात मोठी समस्या आहे. येथील देशी गाईंचा वंश पूर्णपणे नाहीसा करून तेथे युरोपीय गाइं&ंचा वंश म्हणजे जर्सी आणि होल्स्टन या गाई आणण्याचा प्रयत्न झाला. त्यासाठी सरकार दरबारीही भारतीय गाय ही अमान्य करण्यात आली. म्हणजे ज्या गाईच्या दुधाने, शेणाने आणि गोमूत्राने शेती, वैद्यक, पर्यावरण रक्षण अशा दहा क्षेत्रात प्रचंड फायदे होतात, अशी गाय कोणाच्या तरी दुर्लक्षातून हटविली गेली हे मान्य करणेच अशक्मय आहे. येथे देशी गाईसाठी बँकांकडून कर्जेही मिळणे अशक्मय झाले. देशी गाईचे संरक्षण आणि संवर्धन यांचा आग्रह स्वातंत्र्य चळवळीतही धरला गेला आणि संविधानातही त्याचा त्याच गांभिर्याने समावेश केला. पण एका बाजूला भारत हा जगातील सर्वात मोठा गोमांस निर्यातदार झाला आणि दुसऱया बाजूला त्यावर खरेदीसाठी कर्ज मिळणेही अशक्मय झाले. या दुर्दैवाचे अपराधी कोण, याची येणाऱया काळात तपासणी करावी लागणार आहे. न्यूझीलंडमधील एकाच माणसाने 5 लाख गाईंची कृत्रिम गर्भधारणा घडविली ही फक्त एक चुणूक आहे.
कृत्रिम रेतनाचे प्रयोग जगातील बहुतेक देश गेली 60-70 वर्षे बघत आहेत. त्याचा सर्वात मोठा उपयोग म्हणजे ज्या गाई दूध अधिक देतात, त्यांच्या वळूचे रेतन कमी दूध देणाऱया गाईच्या संयोगात आणायचे. असा प्रयोग करून भारतात गेल्या साठ वर्षात पाच कोटी गाई वाढवल्या आहेत. त्यांनी दूधही भरपूर दिले आहे. पण त्या दुधात दुधाचे सामर्थ्य म्हणून जी बाब असते, ती नाही. क्रॉसब्रीडच्या दुधामध्ये अनेक मूलभूत घटकांचा अभाव असतो. तसेच हिस्टॅडिन नावाचा शरीराला अनारोग्यकारक घटक असतो. या कारणासाठी युरोपमध्येही क्रॉसब्रीड दूध स्वीकारले नाही. न्यूझीलंडमधील ड्रिक वॅन डेन वेन याने गेल्या 40 वर्षात गाईच्या 5 लाख कृत्रिम गर्भधारणा घडवून आणल्या. त्याने एक कंपनीच काढली व ती कंपनी आता बहुराष्ट्रीय कंपनीसारखी व्यवसाय करत आहे. त्या कंपनीचे नाव ‘सीआरव्ही ऍम्ब्रीड’ असे आहे. मूळचा हॉलंडचा असलेल्या ड्रिक वॅनने युरोपियनांच्या जगात क्रॉसब्रिड गाई पुरवण्याच्या धोरणाचा फायदा करून घेतला.
महासत्तांना प्रामुख्याने युरोपिय महासत्तांना जगातील शंभराहून अधिक देशात या क्रॉसब्रिड गाई पाठविण्यात यश आले. त्यामुळे तेथील दूध म्हणजे क्रॉसब्रिडचे दूध असेच समीकरण झाले आहे. त्याहीपेक्षा भारतातील गाईच्या जागी युरोपीय गाई का पाठवायच्या यावर इ. स. 1810 च्या दशकात ब्रिटनच्या संसदेमध्ये जी चर्चा झाली होती ती येथे महत्त्वाची आहे. भारतातील संस्कृती प्रभावहीन केली की आपण तेथे अनेक शतके राज्य करू शकू. दुसरे असे की, भारतीय लोकांची शेती ही गाईवर आधारित आहे आणि त्याचमुळे ती वैभवी आहे. तेथे अजून एक कारण आहे ते म्हणजे भारतीय संस्कृती ही गाईमुळे टिकून आहे. ती गायच जर तेथून अदृश्य झाली तर आपल्याला ख्रिश्चन धर्माचा प्रचार करणे सोईचे जाणार आहे. त्यानंतरचा इतिहास आपल्याला माहीत आहे. ब्रिटिशांनी येथे दीडशे वर्षे राज्य केले. त्यांच्या गाई येथे पाठविण्याचा प्रयत्न केला, पण त्याला यश आले नाही. पण ब्रिटिश गेल्यावर मात्र 60-70 वर्षांच्या राजवटीत येथे 5 कोटीपेक्षा अधिक क्रॉसब्रिड गाई घरोघर पोहोचविण्याचे काम झाले. त्याची किंमत आज देश मोजतो आहे.
– मोरेश्वर जोशी