सांगरूळ /प्रतिनिधी
करवीर तालुक्यातील म्हारुळ येथील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये नऊ जागांसाठी माघारीच्या अंतिम वेळेपर्यंत नऊ अर्ज शिल्लक राहिल्याने ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाली आहे .ग्रामपंचायतीच्या इतिहासात प्रथमच सर्व नेते व ग्रामस्थांना एकत्र आणून ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध करण्यात गावातील दूध संस्था कर्मचारी संघटनेला यश मिळाले आहे . यामुळे दूध संस्था कर्मचारी संघटनेचे गावातील नागरिकांबरोबरच परिसरातील गावातून कौतुक होत आहे .
म्हारुळ हे करवीर तालुक्यातील राजकीय दृष्ट्या एक संवेदनशील गाव आहे.
पाच-सहा वर्षापूर्वी येथील सर्व दूध संस्थांचे सचिव व कर्मचारी यांनी एकत्र येऊन दूध संस्था कर्मचारी संघटनेची स्थापना केली . गावातील सर्व दूध संस्थांच्यामध्ये सलोख्याचे संबंध प्रस्थापित करत संस्थांच्या दूध संकलनामध्ये वाढ करण्याचा प्रयत्न केला .जनावरांच्या साठीच्या शासनाच्या व गोकुळ दूध संघाच्या सर्व योजना या संघटनेमार्फत उत्पादकाच्या गोठ्यावरती जाऊन यशस्वीपणे राबविल्या आहेत.त्यांच्या कामामुळे गोकुळ दूध संघामार्फत या संघटनेचा सन्मान केला आहे .सर्व दूध संस्थांचे कर्मचारी एकत्रितपणेसर्व दूध संस्थांच्या दूध उत्पादकांच्या साठी एकत्रित प्रयत्न करत असल्याने ग्रामस्थांमध्ये ही त्यांच्याबद्दल विश्वासाचे व आपुलकीचे नाते निर्माण झाले .
संघटनेच्या स्थापनेपासून हे कर्मचारी गावातील सर्वच उपक्रमामध्ये संघटितपणे राहून विधायक उपक्रम यशस्वीपणे पार पडत आहेत .
ग्रामपंचायतीच्या निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर होणे अगोदरच दूध संस्था कर्मचारी संघटनेने बैठक घेऊन गावातील ग्रामस्थांच्या तील एकता कायम राखण्यासाठी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला . गावात हनुमान दूध संस्था , दत्त दूध संस्था, भैरवनाथ दुध संस्था , गणेश दूध संस्था, जनाई महिला दूध संस्था, संत गोरा कुंभार दूध संस्था
एकूण सहा प्राथमिक दूध संस्था आहेत .या प्रत्येक दूध संस्थेतील सचिव आणि कर्मचारी संघटनेत सहभागी आहेत . प्रत्येक दूध संस्थेने आपल्या संस्थेतील दूध उत्पादक सभासदांच्या स्वतंत्र बैठका घेऊन ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी नागरिकांच्या व ग्रामस्थांच्यात जागृती केली .प्रत्येक दूध संस्थेच्या दूध उत्पादक सभासदांनी व नेत्यांनी ग्रामपंचायत बिनविरोध करण्यासाठीचे संपूर्ण अधिकार आपल्या संस्थेच्या सचिवाना दिला .यानुसार दूध संस्थेच्या उत्पादक सभासदांच्या संख्येनुसार जागांचे वाटप करण्यात आले .
यामध्ये तुझे माझे असा भेदभाव न करता सर्वच दूध संस्थांचे पदाधिकारी व गटाचे नेते व ग्रामस्थांनीही मान्यता देत मोलाची साथ दिली . दूध संस्था संघटनेचे अध्यक्ष सरदार नारायण पाटील, रंगराव भगवान पाटील, सरदार पांडुरंग पाटील, सुभाष शंकर मांडेकर, अभिजीत शिवाजी चौगुले ,उत्तम यशवंत पाटील ,संदीप बळवंत पाटील, संग्राम रंगराव चौगले, शिवाजी तुकाराम कुंभार ,गणेश लक्ष्मण कुंभार , डॉ .दीपक भैरू कांबळे ,दिलीप भास्कर चव्हाण यांनी संघटितपणे प्रयत्न करून गावातील प्रमुख नेतेमंडळी व ग्रामस्थांच्या सहकार्याने निवडणूक बिनविरोध करण्यात यश मिळविले .
प्रभाग नुसार बिनविरोध झालेली ग्रामपंचायत सदस्य पुढील प्रमाणे
प्रभाग क्रमांक एक –
राजाराम मारुती कुंभार (ओ .बी .सी .पुरुष), अलका सरदार पाटील (सर्वसाधारण महिला ),सागर सदाशिव चौगले (सर्वसाधारण पुरुष)
प्रभाग क्रमांक दोन
युवराज बाजीराव पाटील (सर्वसाधारण पुरुष )
रूपाली मोहन चौगुले, (सर्वसाधारण महिला ) वंदना नामदेव म्हाकवेकर (सर्वसाधारण महिला)
प्रभाग क्रमांक तीन
श्रीमती शालाबाई गणपती गुरव ( सर्वसाधारण महिला ) ,रेखा प्रकाश कुंभार (ओ .बी .सी महिला )प्रकाश नामदेव कांबळे, (अनुसूचित जाती-जमाती पुरुष )
दूध संस्थांच्या मध्ये सलोख्याचे संबंध प्रस्थापित करत दूध संकलन वाढी बरोबरच दुधाचा दर्जा वाढवण्यासाठी दूध संस्था कर्मचारी एकत्र येऊ संघटनेच्या माध्यमातून काम केले या कामाची व्याप्ती वाढत जाऊन गावाच्या दृष्टीने ग्रामपंचायत निवडणुकीचा विषय जिव्हाळ्याचा होता . या निवडणुकीमुळे पुन्हा ग्रामस्थांच्या मनामध्ये एकमेकाबद्दल द्वेषाच्या भावना वाढीस लागल्या असत्या . पुन्हा गावातील एकटीचे वातावरण दूषित झाले असते .
गावातील सर्वच प्रमुख नेते व ग्रामस्थांनी संघटनेला निवडणूक बिनविरोध करण्यास सहकार्य करत दिलेल्या प्रोत्साहनामुळे गावाच्या हितासाठी एक चांगले काम करण्यात यश आले याचा मनस्वी आनंद होत आहे .भविष्यात संघटनेच्या माध्यमातून गावातील नागरिकांमध्ये बंधुत्वाची भावना वाढीस लागण्यासाठी व एकतेतून गावाचा विकास करण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करणार अशी प्रतिक्रिया दूध संस्था कर्मचारी संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केली .