प्रतिनिधी/ सातारा
दरवर्षी एप्रिल महिन्यात देवगड हापूस विक्रीसाठी सातारच्या बाजारपेठेत दाखल होतो. यंदा मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन आहे. यामुळे देवगड हापूसचा आब्यांचा आस्वाद घेता येणार का ? असा प्रश्न उपस्थित झाला होता. मात्र लॉकडाऊन शिथील झाल्याने यांचा फायदा विक्रेत्यांनी घेतला आहे. सातारच्या बाजापेठेत देवगड हापूसची विक्री सूरू आहे. मात्र दर जास्त असल्याने सर्वसामान्यांनी खरेदीकडे पाठ फिरवली आहे.
कोरोना बाधित रूग्ण ज्या भागात आहेत. असे रोड झोन वगळता इतर भागातील लॉकडाऊनचे नियम शिथील करण्यात आले आहेत. यांचा सगळयात जास्त फायदा विक्रेत्यांना झालेला आहे. उन्हाळयात देवगड हापूस आब्यांची विक्री संपूर्ण महाराष्ट्रात केली जाते. यंदा मात्र कोरोनामुळे सातारच्या बाजारपेठेत आंबा विक्रीसाठी दाखल झाला नव्हता. दरम्यान, साताऱयातील लॉकडाऊन शिथील झाले असून खरेदीच्या वेळा वाढल्या आहेत. बाजापेठेत देवगड हापूस आब्यांची आवक झाली आहे. 600 ते 700 रूपये डजन अशी विक्री सुरू आहे. तर आब्यांची पेटी 2 हजार ते अडीज हजार अशी विकली जात आहे. या किंमती सर्वसामन्यांच्या खिशाला परवडणाऱया नाहीत. यामुळे यांच्या खरेदीकडे ग्राहकांनी पाठ फिरवली आहे. तसेच मागणी कमी असल्याने यंदा खरेदी मोठया प्रमाणावर होईल का ? ही चिंता विक्रेत्यांना लागून राहिली आहे.
इतर फळे झाली गायब-
लॉकडाऊनमुळे लोकांना घराबाहेर पडण्यास बंदी घालण्यात आली होती. याचा फटका फळ विक्रेत्यांना बसला आहे. द्राक्षे, कलिंगड, चिकू, केळ ही फळे विकता विक्रेते संकटात सापडले होते. यातून फायदा कमी अन् तोटा जास्त सहन करावा लागला. यामुळे जेवढा माल विक्रीसाठी आणला होता. तो संपल्यानंतर पुन्हा या फाळांची विक्री बंद करण्यात आल्याचे विक्रेत्याकडून सांगण्यात येत आहे.