ऑनलाईन टीम/तरुण भारत
कर्नाटकातील कुंडूपूर येथील शासकीय पदवीपूर्व महाविद्यालयात मुस्लीम मुलींना हिजाब परिधान करून येण्यास मनाई करण्यात आल्याचे समोर आल्याने, राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. हा प्रकार म्हणजे या मुलींना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न आहे, अशी टीका कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते सिद्धरामय्या यांनी केली आहे. तर, महाविकासआघाडी सरकारमधील मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी देखील या घटनेवरून काल तीव्र शब्दात टीका केली होती. आता काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी देखील या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. “विद्यार्थ्यीनींचे हिजाब त्यांच्या शिक्षणाच्या आड आणून आपण भारतातील मुलींचे भविष्य लुटत आहोत. देवी सरस्वती सर्वांना ज्ञान देते. ती भेद करत नाही.” असं राहुल गांधी यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.