प्रतिनिधी/चिकोडी
शिरोळ येथील श्रीदत्त साखर कारखान्याच्या धर्तीवर देशभरात क्षारपड जमीन सुधारणा प्रकल्प राबविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय केंद्रीय कृषी राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी घेतला. बेंगळूर येथे आयोजित बैठकीला राज्याचे उद्योगमंत्री मुरगेश निराणी, शिरोळ येथील दत्त कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील, उद्योग आयुक्त गुंजन कृष्णा, अतिरिक्त वाणिज्य सचिव रामन रेड्डी आदी उपस्थित होते.
सदर बैठकीत कारखान्याच्या वतीने या प्रकल्पाबद्दल पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनद्वारे सविस्तर माहिती देण्यात आली. याप्रसंगी राज्याचे उद्योगमंत्री मुरगेश निराणी यांनी किमान 10 राज्यात अशा पद्धतीचे प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यास मंजुरी द्यावी, अशी विनंती केंद खाrय कृषी राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांच्याकडे केली. मंत्री करंदलाजे यांनी या प्रकल्पाची यशस्वीता व शेतीच्या दृष्टीने महत्त्व विचारात घेऊन या प्रकल्पाबद्दलची सविस्तर माहिती घेऊन शेतकऱयांच्या आर्थिक उन्नतीच्या दृष्टीने अशाच पद्धतीने केंद्र शासनाच्यावतीने महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात क्षारमुक्त जमिनीचा प्रकल्प राबविणार असल्याचे या बैठकीत सांगितले. तसेच गेल्या अनेक वर्षांपासून पडिक असलेल्या जमिनी या प्रकल्पामुळे उत्पादनक्षम होत असल्याने त्यांनी या प्रकल्पाबद्दल कौतुकोद्गार काढून प्रकल्प देश पातळीवर अनुकरणीय असल्याचे सांगितले.
शिरोळ तालुक्मयात अंदाजे 10 हजार हेक्टर इतकी जमीन क्षारपड असून, गेल्या 30 ते 40 वर्षांपासून कोणत्याही पिकाविना त्या पडून होत्या. तसेच काही हजारो हेक्टर जमिनी क्षारपड होत असून त्या जमिनीमधील उत्पादन क्षमता अत्यल्प अशी आहे. नापीक जमिनींमुळे शेतकऱयांनाही वस्तुतः आपल्या जमिनी कोठे आहेत, याचीही कल्पना नव्हती. या क्षारपड समस्येमुळे तालुक्मयातील शेतकऱयांचे कोटय़वधी रुपयांचे नुकसान होत होते व होत आहे. कार्यक्षेत्रातील या क्षारपड जमिनींमुळे शेतकऱयांचे होणारे कोटय़वधी रुपयांचे नुकसान ध्यानात घेऊन दत्त कारखान्याच्या मार्गदर्शनाखाली जमिनी क्षारमुक्त होऊन उत्पादनक्षम होण्याच्या दृष्टीने क्षारमुक्त जमीन प्रकल्प गेल्या चार-पाच वर्षांपासून हाती घेतला आहे. ज्या-त्या गावातील शेतकऱयांनी एकत्र येऊन सहकारी संस्था स्थापन करून, जमिनी क्षारमुक्त होण्याकरिता कृत्रिम सच्छद्रि निचरा प्रणाली व बंदीस्त मुख्य पाईपलाईन या तंत्राचा वापर करून क्षारमुक्तीचा प्रकल्प राबविण्यात येत आहे. हा प्रकल्प कारखान्याच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी स्वखर्चातून राबवित आहेत. सदरचा प्रकल्प आज अखेर कारखाना कार्यक्षेत्रातील 18 गावांमध्ये राबविण्यात येत असून याद्वारे 6690 एकर इतकी जमीन क्षारमुक्त होणार आहे. या प्रकल्पांतर्गत 152 कि. मी. मुख्य बंदीस्त पाईप लाईनचे काम पूर्ण झाले आहे व 1825 एकर इतक्मया जमिनीमध्ये कृत्रिम सच्छद्रि निचरा प्रणालीचे काम पूर्णत्वास जाऊन सदरच्या जमिनी पिकावू झाल्या आहेत. या प्रकल्पामुळे एका वर्षात जमिनीतील क्षारतेत 83 टक्के इतकी घट झाली आहे. तसेच उत्पादनात दुपटीने वाढ झाली असून काही ठिकाणी 100 टक्के इतकी वाढ झाली आहे. या प्रकल्पास देश व राज्य पातळीवर विविध मान्यवर व तज्ञांनी भेट देऊन प्रकल्पाच्या यशस्वीतेवर शिक्कामोर्तब केला आहे.
या बैठकीस कर्नाटक राज्याचे उद्योगमंत्री मुरगेश निराणी, उद्योग आयुक्त गुंजन कृष्णा, अतिरिक्त वाणिज्य सचिव रामन रेड्डी, सचिव कृषी विभाग दलवाई, फलोद्यान व कृषी विभागाचे सचिव, तसेच दत्त कारखान्याचे संचालक अरुण देसाई, इंद्रजीत पाटील, बाहुबली पाटील, कारखान्याचे मुख्य शेती अधिकारी श्रीशैल हेगाण्णा, किर्तीवर्धन मरजे व सुदर्शन तकडे आदी उपस्थित होते.