नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भ्रष्टाचाराच्या आरोपांवरुन राजीनामा द्यावा लागलेले महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या पदरी सर्वोच्च न्यायालयातही निराशाच पडली आहे. आपल्याविरोधात कोणतेही कठोर कारवाई केली जाऊ नये अशी मागणी करणारी याचिका त्यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केली होती. मात्र. न्या. खानविलकर, न्या. कृष्ण मुरारी आणि न्या. व्ही. रामसुब्रम्हणियम यांच्या खंडपीठाने त्यांना असे संरक्षण देण्यास नकार दिला. या निर्णयामुळे अनिल देशमुख यांच्या अटकेची शक्यता गडद झाली आहे, असे कायदेतज्ञांचे मत आहे.
आतापर्यंत ईडीकडून देशमुख यांना चारवेळा समन्स पाठविण्यात आले आहे. मात्र, चारही वेळा त्यांनी ईडीसमोर येण्यास टाळाटाळ केली आहे. आपले प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असेपर्यंत ईडी आपल्या विरोधात कठोर करवाई करु शकत नाहीं, असा दावा त्यांनी केला होता. तथापि आता सर्वोच्च न्यायालयानेच त्यांना दिलासा देण्यास नकार दिल्याने ईडीचा मार्ग मोकळा झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयानेही त्यांना अटकेपासून संरक्षण देण्यग्नास नकार दिला होता.
दोन सहकाऱयांना अटक
भ्रष्टाचार प्रकरणात देशमुख यांचे दोन सहकारी संजीव पलांडे (व्यक्तीगत सचिव) आणि कुंदन शिंदे (व्यक्तीगत साहाय्यक) यांना यापूर्वीच ईडीने अटक केलेली असून ते 6 जुलैपासून ईडीच्या कोठडीत आहेत. त्यांनी देशमुख यांच्या व्यवहारांविषयी माहिती ईडीला दिल्याचे बोलले जाते.
देशमुख कोठे आहेत ?
देशमुख हे गेला महिनाभर बाहेर दिसलेले नाहीत. ते कोठे आहेत, याविषयी त्यांचे निकटवर्तीय किंवा त्यांच्या पक्षाचे इतर नेते यांच्याकडून कोणतीही माहिती मिळालेली नाही. तथापि, ते फरार नाहीत एवढी माहिती देण्यात आली आहे. आता ईडी पुढे कोणतीं कारवाई करणार यग्नाकडे औत्सुक्याने पाहिले जात आहे.