प्रतिनिधी /बेळगाव
देशमुख रोड, टिळकवाडी येथील पथदीप मागील काही दिवसांपासून सुरूच आहेत. या संदर्भात मनपाच्या पथदीप विभागाशी संपर्क साधूनही त्यांच्याकडून कोणतीच हालचाल करण्यात आलेली नाही. त्यामुळे पथदीप विभागाने याकडे लक्ष पुरवावे, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
शहरातील पथदीप दिवसा सुरू व रात्रीचे बंद अशी अवस्था झाली आहे. बऱयाच भागात पथदीप बंद असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. काही भागात दिवसाही पथदीप सुरू ठेवण्यात येत असल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. एकीकडे वीज वाचवा म्हणून अभियान राबवणाऱया सरकारी विभागाकडूनच अशा प्रकारे विजेचा अपव्यय केला जात आहे.