ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या पर्वातील तिसरा अर्थसंकल्प आज संसदेत सादर होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन सकाळी 11 वाजता अर्थसंकल्प मांडतील. देशाला कोरोनाच्या मंदीतून सावरण्यासाठी आणि देशाच्या विकासवृद्धीसाठी अर्थसंकल्पात नेमक्या कोणत्या तरतुदी केल्या जातील, याची उत्सुकता देशातील उद्योजक, नोकरदारांसह सर्वसामान्यांना लागली आहे.
कोरोनामुळे आर्थिक संकटात आलेल्या अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी रोजगरिनिर्मितीला चालना, आरोग्य क्षेत्राला उभारी, उद्योगांसाठी भरिव तरतूद, प्राप्तिकरात सवलत, यासह शेतीक्षेत्रालाही या अर्थसंकलपातून अपेक्षा आहेत.
तसेच पूर्व लडाखमधील भारत-चीन सैन्यातील तणावाची परिस्थिती आणि पाकिस्तानचा वाढता उपद्रव पाहता संरक्षण क्षेत्रातही भरीव होणे अपेक्षित आहे.