ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत घट पहायला मिळत आहे. बुधवारी देशात 30 हजार 570 नव्या संक्रमितांची नोंद झाली. 431 रुग्ण दगावले. तर 38 हजार 303 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून, देशाचा रिकव्हरी रेट 97.64 टक्के आहे.
देशात आतापर्यंत 3 कोटी 33 लाख 47 हजार 325 लोक कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. त्यामधील 3 कोटी 25 लाख 60 हजार 474 रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. सद्यस्थितीत देशात 3 लाख 42 हजार 923 उपचारार्थ रुग्ण आहेत. तर 4 लाख 43 हजार 928 रुग्णांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. देशात आतापर्यंत 76.57 कोटी नागरिकांना लसीचा पहिला आणि दुसरा डोस देण्यात आला आहे. मागील 24 तासात 64.51 लाख नागरिकांचे लसीकरण झाले.