मुंबई
देशभरातील 82 टक्के सीईओंनी एक दिलासादायक वक्तव्य नुकतंच केलंय, तेही अर्थव्यवस्थेबाबत. त्यांनी उत्पादनांच्या मागणीत ऑक्टोबरनंतर सुधारणा होणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. गेल्या 2 महिन्यांपासून असलेल्या मंदिसदृश परिस्थितीवर ही बातमी नक्कीच फुंकर घालणारी म्हणता येईल.
देशातील विविध उद्योगात कार्यरत असणाऱया सीईओंचे मत एकंदर व्यवसायाच्या हालचालींबाबत व अर्थव्यवस्थेबाबत जाणुन घेतले होते. यात बहुतांश सीईओंनी अर्थव्यवस्था ऑक्टोबरनंतर रूळावर येईल असे म्हटले आहे. यात 30 टक्के सीईओंनी येत्या ऑगस्टनंतर भारतीय अर्थव्यवस्था पूर्वपदावर यायला सुरूवात होणार असल्याचे म्हटले आहे तर 60 टक्के सीईओंच्या मते ऑक्टोबरनंतर अर्थव्यवस्था पूर्वपदावर येण्यास सुरूवात होईल.
योग्य दिशेने वाटचाल करू शकेल, असं मत नोंदवलंय. अजून 10 टक्के जणांनी तर अर्थव्यवस्था महिनाभरातच वेग घेऊ शकणार असल्याचे भाकीत वर्तवले आहे. या बातमीने उद्योजक, व्यावसायिकांना काहीसा दिलासा मिळेल हे नक्की.