ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
जगभरात हाहाकार माजवणाऱया कोरोना विषाणूची आत्तापर्यंत देशातील 887 जणांना बाधा झाली आहे. तर यात 20 जणांचा मृत्यू झाला असून, 73 रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत.
देशात दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. तसेच विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्यात येत आहेत. महाराष्ट्रातही शुक्रवारी 23 नव्या रुग्णांची भर पडली असून, कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या 153 वर पोहचली झाली आहे. तर आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी संचारबंदीच्या काळात घरातच बसून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.