भारतीयांच्या जीवनात संवाद क्रांती
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतामध्ये मोबाईल फोनच्या सुविधेला 25 वर्षे पूर्ण झाली आहेत. जुलै 1995 मध्ये प्रथमच देशात मोबाईल सेवेचा प्रारंभ करण्यात आला होता. आज भारतात कोटय़वधी लोकांपर्यंत ही सेवा पोहोचली आहे. परंतु तेंव्हापासून आताच्या मोबाईल फोनमध्ये आमुलाग्र बदल झाल्याचे पहावयास मिळत आहेत.
शिक्षण, शॉपिंग, बँकिंग आणि माहितीचा शोध घेण्यासाठी कमीत कमी कालावधीत सेवा मिळवण्यासाठी उत्तम माध्यम म्हणून मोबाइलचा वापर केला जात आहे. 25 वर्षांच्या अगोदर पीसीओच्या लांब लाईनसोबत सुरु झालेला मोबाईलचा प्रवास आता घरोघरी पोहोचला असून याने सर्व भारतीयांचे जीवनमान बदलून टाकले आहे. मोदी टेल्स्ट्राने यांनी मोबाईल सेवेचा प्रारंभ भारतात केला होता. त्यांनीच या सेवेला मोबाईल नेट असे नाव दिले आहे. सदरची सेवा लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी नोकिया हँडसेटची मोठी मदत झाल्याची नेंद आहे. मोदी टेल्स्ट्रानंतर स्पाइस टेलीकॉम नावाने सेवा सुरु झाली होती. देशात कोलकाता ते दिल्ली पहिला कॉल 31 जुलै 1995 मध्ये भारतात करण्यात आला होता.
ट्रायचा उदय
1997 मध्ये भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण(ट्राय)ची स्थापना झाली असून ग्राहकांच्या ती हक्काचे संरक्षण आणि कंपन्यांमध्ये योग्य समन्वयासोबत देखरेख करते.