ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारतात आतापर्यंत 2 कोटी 06 लाख 65 हजार 148 लोक कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. त्यामधील 1 कोटी 69 लाख 51 हजार 731 रुग्ण पूर्णपणे बरे झाले असून, 34 लाख 87 हजार 229 रुग्ण उपचार घेत आहेत.
देशात मंगळवारी एका दिवसात 3 लाख 82 हजार 315 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 3 लाख 38 हजार 439 रुग्ण कोरोनामुक्त झाले. 3780 रुग्णांचा मृत्यू झाला असून, मृतांची एकूण संख्या 2 लाख 26 हजार 188 एवढी आहे. आतापर्यंत पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील 16 कोटी 04 लाख 94 हजार 188 जणांना लस देण्यात आली आहे.