ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. देशात लॉक डाऊन जारी करण्यात आले आहे. त्यातच लॉक डाऊनच्या चौथ्या टप्प्यात शाळा – कॉलेज सुरू करण्यात येणार असल्याची बातमी समोर आली आहे. यावर केंद्रीय गृह मंत्रालयाने आपले स्पष्टीकरण दिले आहे. शैक्षणिक क्षेत्रातील शाळा कॉलेज उघडण्या संबंधी अजून कोणताही निर्णय घेतला नसल्याचे केंद्रीय गृहमंत्रालयाने म्हटले आहे.
केंद्रीय गृह मंत्रालयाच्या प्रवक्त्यांकडून याबाबत ट्विट करण्यात आले आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाकडून असा कोणताही निर्णय घेण्यात आला नाही आहे. तसेच देशातील सर्व शैक्षणिक संस्थांवर अद्यापही निर्बंध कायम राहणार आहेत, अशी माहिती ट्विट करून दिली आहे.
दरम्यान, कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी मार्चपासून सर्व शैक्षणिक संस्था बंद आहेत.