ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
केंद्र सरकारतर्फे स्वच्छ भारत अभियानांतर्गत राबविण्यात आलेल्या ‘स्वच्छ भारत सर्वेक्षण 2020’ चे निकाल आज जाहीर केले गेले. सलग चौथ्यांदा इंदौर शहराने देशातील स्वच्छ शहरांच्या यादीत अव्वल स्थान मिळवले आहे. गुजरातमधील सूरत दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर नवी मुंबई आहे. नवी मुंबई तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात स्वच्छ शहर ठरलं आहे.
केंद्रीय शहरी विकास मंत्रालयाच्या वतीने हरदीपसिंह पुरी यांनी याची आज घोषणा केली आहे. स्वच्छ भारत सर्वेक्षणाचे यंदा पाचवे वर्ष आहे.
याआधी ‘स्वच्छ सर्वेक्षण 2019’ मध्ये नवी मुंबईने स्वच्छ शहरात राज्यात प्रथम व देशात सातव्या क्रमांक मिळवला होता.
या वर्षी पहिल्या 10 शहरांमध्ये नवी मुंबईचा समावेश आहे. नवी मुंबईसह इतर शहरांचाही समावेश आहे. नाशिक 11, ठाणे 14, पुणे 15, नागूपर 18, कल्याण डोंबिवली 22, पिंपरी चिंचवड 24, औरंगाबाद 26, वसई-विरार 32 आणि मुंबई 35 व्या क्रमांकावर आहे.