ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात कोरोनाचा फैलाव दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, सुदैवाने देशातील 400 जिल्हे अद्याप कोरोनामुक्त आहेत. नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी एका वृत्तवाहिनीला याबाबतची माहिती दिली आहे.
राजीव कुमार म्हणाले, देशात अद्याप 400 जिल्हे कोरोनामुक्त आहेत. या जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत एकही कोरोना रुग्ण अढळला नाही. त्यामुळे या देशात लॉकडाऊन वाढवण्याची गरज नाही. देशात आत्तापर्यंत 6771 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 228 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत तर 635 जण या आजारातून बरे झाले आहेत. देशात आढळलेल्या एकूण कोरोना रूग्णांपैकी 80 टक्के रुग्ण केवळ 62 जिल्ह्यांतून सापडले आहेत. त्या ठिकाणी लॉकडाऊनसोबतच हॉटस्पॉट भागही सील करून कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असेही त्यांनी सांगितले.