कृषितज्ञ दिलीप अस्वले यांचे प्रतिपादन : वडगाव येथे सेंद्रिय शेतीवर पार कार्यशाळा
प्रतिनिधी / बेळगाव
देशात रासायनिक खतांचा मोठय़ा प्रमाणात भडिमार करण्यात येत आहे. या खतांच्या अधिक वापराने जमिनी नापीक होऊ लागल्या आहेत. हे असेच सुरू राहिल्यास 2035 पर्यंत देशातील 70 टक्के जमिनी नापीक होतील. त्यामुळे सेंद्रिय शेतीकडे वळा, असे प्रतिपादन कृषितज्ञ दिलीप अस्वले यांनी केले.
मंगळवारी वडगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी सेंद्रिय शेतीसोबतच कमी पाण्यामध्ये करण्यात येणाऱया शेतीबाबत शेतकऱयांना मार्गदर्शन केले. काही पिकांना आपण गरजेपेक्षा अधिक पाणी दिल्यामुळे जमिनी क्षारपड होऊ लागल्या आहेत. त्यामुळे पाण्याचे नियोजन आवश्यक असल्याचे सांगितले. यावेळी मनोहर कालकुंद्रीकर, अमोल देसाई, माजी नगरसेवक मनोहर हलगेकर, भाऊ पाटील, केदारी बाळेकुंद्री, मोनाप्पा बाळेकुंद्री, आप्पाजी हलगेकर, बाळू बाळेकुंद्री, नाना चतुर, देवकुमार बिर्जे यासह शेतकरी उपस्थित होते.