ऑनलाइन टीम / नवी दिल्ली :
भारतात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत, तसेच मृत्यू दरात वाढ होत आहे. गेल्या 24 तासात 1035 रुग्णांची भर पडून देशभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या 7 हजार 447 वर पोहचली आहे. तसेच 24 तासात 40 जण दगावले आहेत. देशात 239 कोरोना रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. तर 642 रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.
ते म्हणाले, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉक डाऊन जारी करण्यात आले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉक डाऊन च एक महत्त्वाचा उपाय आहे. देशात लॉक डाऊन केले नसते तर कोरोनाग्रस्तांची संख्या 8 लाख पर्यंत वाढली असती. असं ही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
तसेच काल एका दिवसात 16 हजार 564 लोकांची टेस्ट करण्यात आली. त्याचबरोबर देशातील 586 कोविड रुग्णालयात 1लाख बेड तयार आहेत.
गृह मंत्रालयाचे संयुक्त सचिव श्रीवास्तव यांनी सांगितले की, ग्रुप मंत्रालयाद्वारे सर्व राज्यांना पत्र लिहून हॉस्पिटल मध्ये काम करणारे डॉक्टर व सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना पोलीस सुरक्षा प्रदान करण्याचे आदेश दिले आहेत.