ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात शनिवारी 39 हजार 070 नव्या संक्रमितांची नोंद झाली. 43 हजार 910 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली. तर 491 रुग्ण दगावले.
देशात आतापर्यंत 3.19 कोटी लोक कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. त्यामधील 3.10 कोटी रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले आहेत. सद्यस्थितीत देशात 4.06 लाख उपचारार्थ रुग्ण आहेत. तर 4.27 लाख रुग्णांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावले आहेत.
देशात आजपर्यंत 50 कोटी 68 लाख 10 हजार 492 नागरिकांना लसीचा पहिला आणि दुसरा डोस देण्यात आला आहे. मागील 24 तासात 55 लाख 91 हजार 657 नागरिकांचे लसीकरण झाले.