ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लाॅक डाऊन जारी करण्यात आले आहे. तरी ही देशात कोरोनारुग्णांची संख्या दिसेंदिवस वाढतच चालली आहे. गेल्या 24 तासात 693 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले, गेल्या 24 तासात कोरोनारुग्णांची संख्या वाढ झाल्याने देशातील कोरोनाबाधितांची संख्या आता 4068 वर पोहचली आहे. तसेच काल दिवसभरात तीस कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आज आत्तापर्यंत दोन जणांचा मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे बळींची संख्या आता 109 वर पोहचली आहे. तर 291 लोक कोरोनातून बरे झाले आहेत.
तसेच तबलीगी जमात प्रकरणी संपर्कात आलेल्या आत्तापर्यंत जवळपास 25 हजार 500 लोकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.
त्याचबरोबर पाच लाख टेस्टिंग किट ची ऑर्डर देण्यात आली आहे असं ही अग्रवाल यांनी यावेळी स्पष्ट केले