ऑनलाइन टीम / नवी दिल्ली :
देशातील कोरोनाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे चित्र आहे. गेल्या 24 तासात कोरोनाच्या 991 रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे देशातील कोरोना रुग्णांची संख्या 14 हजार 378 पोहचली आहे. एकूण मृतांचा आकडा 480 वर पोहचला असून, गेल्या 24 तासात 43 जण दगावले आहेत. तर आत्तापर्यंत 1992 रुग्ण बरे झाले असते. अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव आणि प्रवक्ते लव अग्रवाल यांनी आज दिली.
ते म्हणाले, परदेशी नागरिकांच्या व्हिसा बाबत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, भारतात अडकलेल्या परदेशी नागरिकांच्या व्हिसा मध्ये वाढ करण्यात येणार आहे. यासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नसल्याचे त्यांनी सांगितले. जे विदेशी नागरिक भारतात अडकले आहेत त्यांना व्हिसा वाढवून घेण्यासाठी तीन मे पर्यंतचा अवधी दिला गेला आहे. तसेच 12 राज्यातील 22 जिल्ह्यामध्ये गेल्या 24 दिवसात एकही कोरोनाचा रुग्ण आढळला नाही आहे, असं ही त्यांनी यावेळी सांगितले.
दिल्ली तामिळनाडू आंध्र प्रदेशात तबलीगी जमातीचे रुग्ण आहेत. दिल्लीत तबलीगी जमातीच्या 63 टक्के लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या लोकांमध्ये वरिष्ठ नागरिकांची संख्या सर्वात जास्त आहे. 40 ते 60 वयोगटातील 10.6 टक्के लोकांचा तर 0 ते 45 वयोगटात हे प्रमाण दहा टक्क्यांवर आहे.
आयसीएमआर द्वारे नॅशनल टास्क फोर्स ची स्थापना करण्यात आली आहे. या द्वारे बुजुर्ग व्यक्ती आणि गरोदर महिलांसाठी आपतकालीन सुविधा पुरवल्या जात आहेत, अशी माहिती आयसीएमआर च्या प्रवक्त्यांनी दिली.
कोरोना रुग्णांसाठी ची रुग्णालये, सुविधा, चाचण्या अशा सर्व आघाड्यांवर क्षमता वाढवण्यात आली आहे. तसेच लॉक डाऊन च्या काळात सोशल डिस्टन्सिंग पाळणे महत्त्वाचे आहे. घराबाहेर पडताना मास्क घालणे बंधनकारक आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली.